युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांची ग्वाही
शिरूर अनंतपाळ (Arvind Patil Nilangekar) : पूर्वी हायवे पहायचे म्हणजे उमरगा, सोलापूरला जावे लागत असे. पण संभाजी भैय्या पालकमंत्री झाल्यानंतर लातूरच्या चारही बाजूंनी हायवे आणले व जिल्हा हायवेच्या नकाशावर आणला. आता निलंगा मतदारसंघातून रेल्वेमार्गही आणणार, अशी ग्वाही भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर (Arvind Patil Nilangekar) यांनी दिली. आज युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान संवाद यात्रेचा चौथा दिवस वांजरखेडा, उमरदरा, गणेशवाडी, कांबळगा, लकडजवळगा, धामणगाव या गावात झाला. यावेळी ते बोलत होते.
लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे 35 हजार तरुणांना व्यवसाय व रोजगार मिळाला. लातूर रोड ते शिरूर अनंतपाळ मार्गे गुलबर्गा रेल्वेचे काम देखील आगामी काळात चालू होणार आहे, त्यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघ देखील रेल्वेच्या नकाशावर आणणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर (Arvind Patil Nilangekar) यांनी केले. या जनसन्मान संवाद यात्रेत विविध विकास कामाचा लोकार्पण, भूमिपूजन व उदघाटन सोहळा संपन्न झाला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार व कृषी योजनेतील लाभार्थ्यांचा व घरकुल योजनेतील वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष, शेषेराव ममाळे,शिरूर अनंतपाळ भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील रोहित पाटील ऋषिकेश बद्दे,माजी सभापती गोविंद चिलकुरे,संतोष शेट्टे, सरपंच माधव नारायनपुरे ,ज्ञानेश्वर चेवले, दत्ता मोहळकर,आप्पाराव सोळुंके, तम्मा माडीबोने, सह अनेक जण उपस्थित होते.
द्वेष पसरवणाऱ्या लोकांना थारा देऊ नका!
या निवडणुकीच्या काळात आपली पोळी भाजून घेण्यासाठी काही लोक येतील. गावात द्वेष पसरवतील. उध्वस्त करणे सोपे असते; पण उभा करणे अवघड आहे. द्वेष पसरवणाऱ्या लोकांना थारा देऊ नका, आपल्या गावचे वातावरण बिघडवू देऊ नका, असे आवाहन अरविंद पाटील निलंगेकर (Arvind Patil Nilangekar) यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला माता भगिनी युवक जनता उपस्थित होते.