Babusingh Maharaj: पाच वर्षाच्या संघर्षनंतर प्रकल्पग्रस्तांना बाबुसिंग महाराज यांच्यामुळे मिळाला न्याय

2 hours ago 1

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडून मिळवून दिला न्याय

मानोरा (Babusingh Maharaj) : विदर्भातील आठ जिल्ह्यातील १६ हजार ६३३ हेक्टर जमीन प्रकल्पकरिता शेतकऱ्याकडून अल्प दरात खरेदी केल्या होत्या, याकरिता विदर्भ बळीराजा प्रकल्प कृती समितीकडून पाच वर्षा पासून लढा उभारून देखील यश मिळाला नाही. तेंव्हा पोहरादेवी येथील धर्मगुरू संत बाबुसिंग महाराज यांनी प्रकल्पग्रस्त यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावल्यामुळे २७ सप्टेंबरला विदर्भातील पाच जिल्हयातील प्रकल्पग्रस्त शेतकरी एकत्र येत बापू आश्रमात बैठक घेऊन हजारो प्रकल्प शेतकऱ्याच्या साक्षीने (Babusingh Maharaj) बाबुसिंग महाराज यांचा सत्कार केला.

पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पोहरादेवीत येऊन केला महाराज यांचा सत्कार

या बैठकीला विदर्भ बळीराजा संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष माणिक गंगावणे, बाबुसिंग पवार, सोनू पवार, उल्हास राठोड, शिवदास ताटे, राधेशाम सिरसाट, देविदास गंगावणे, शिवाजी घुगे, अशोक मगर, मनीषा चक्रनारायण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना कृती समितीचे माणिक गंगावणे म्हणाले की, पश्चिम विर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया व भंडारा या आठ जिल्ह्यातील सन २००६ ते २०१३ पर्यंत १६ हजार ६३३ हेक्टर वरील शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख रुपये प्रमाणे ८३२ कोटी रुपये सानुग्रह अनुदान शासनाने २६ सप्टेंबर ला नियमक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्याने प्रकल्प कृती समिती शेतकरी व पदाधिकारी यांनी २७ सप्टेंबरला पोहरादेवी येथे एकत्र येत धर्मगुरू संत बाबुसिंग महाराज यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना (Babusingh Maharaj) धर्मगुरु बाबुसिंग महाराज म्हणाले की, मागील कित्येक वर्षापासुन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती समितीने लढा उभारून आंदोलने केली आहेत. त्यांच्या मागण्या योग्य असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले, यापुढे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगीतले. यावेळी बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती व यवतमाळ येथील हजारो शेतकरी उपस्थित होते.

५ आक्टोबर ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी निवेदन देवून प्रकल्प ग्रस्त शेतकरी यांच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेतील याकरिता पाठपुरावा करणार असे आश्वासन (Babusingh Maharaj) बाबुसिंग महाराज यांनी दिली.

प्रकल्प ग्रस्त शेतकरी यांच्या २१ मागण्यासाठी घेऊन ते गेल्या पाच वर्षा पासून लढा देत आहे. त्या पैकी हेक्टरी पाच लाख सानुग्रह अनुदान व प्रकल्पग्रस्त यांना ५ टक्के वरून १५ टक्के नोकरीत आरक्षण देवून नोकरीत सामावून घ्यावे, नोकरी देत नसतील तर २० लाख सानुग्रह अनुदान द्यावे हया दोन मागण्या मान्य झाल्या असून अद्याप आदेश मिळालेले नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article