जिल्ह्यातील २९ प्रकल्पांत ९५% साठा:दोन मोठे, तीन मध्यम प्रकल्प यंदा सप्टेंबरमध्येच १०० टक्के भरले

3 hours ago 1
जिल्ह्यांतील दोन मोठे, तीन मध्यम आणि २४ लघु असे मिळून २९ प्रकल्पांत आजच्या स्थितीत ९५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा १३ टक्के जास्त आहे. त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली असून, सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील दोन मोठे, तीन मध्यम प्रकल्प यंदा सप्टेंबरमध्येच १०० टक्के भरले. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण ऑगस्ट महिना आणि चालू सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने सर्वच प्रकल्पांतील जलसाठ्यात यंदा चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दोन्ही मोठ्या प्रकल्पांत ९६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी ‘काटेपूर्णा’ प्रकल्पाने गत आठवड्यातच शंभर टक्के भरला आहे. २९ प्रकल्पांतील जलसाठा जिल्ह्यात ‘काटेपूर्णा’, ‘वान’ हे दोन मोठे, तर ‘मोर्णा’, ‘निर्गुणा’, ‘उमा’ प्रकल्प हे ३ मध्यम व २४ लघु प्रकल्प आहेत. दोन्ही मोठे प्रकल्प ९६ टक्के, तर मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तसेच २४ लघु प्रकल्पांत आजच्या स्थितीत ८९टक्के जलसाठा आहे. उर्वरित पान ४ प्रकल्प संख्या टक्के मोठे प्रकल्प ०२ ९६ मध्यम प्रकल्प ०३ १०० एकुण लघुप्रकल्प २४ ८९ काटेपूर्णा ९८.७५, वान ९६.४९, मोर्णा १००, निर्गुणा १००, उमा १००

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article