धनगर आरक्षणासाठी जलसमाधीचीचिठ्ठी लिहून दोन आंदोलक बेपत्ता:प्रवरा संगम पात्रात शोधमोहीम; आंदोलकांचा 4 तास रास्ता रोको

2 hours ago 1
धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षणाच्या मागणीसाठी नेवासे फाटा येथे नऊ दिवसांपासून ६ जणांचे उपोषण सुरू आहे. यापैकी दोघेजण गुरुवारी बेपत्ता झाले. गोदावरी - प्रवरा संगमावरील पुलावर संभाजीनगर येथील यापैकी एक प्रल्हाद सोरमारे यांची कार पोलिसांना दिसली. त्यात ‘आम्ही जलसमाधी घेत आहोत’ असे लिहिले होते. त्यामुळे पोलिस व अांदोलक गर्भगळीत झाले. पोलिस व शोधपथकाने सायंकाळी उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेतला, मात्र आंदोलक सापडले नाहीत. संभाजीनगरचे प्रल्हाद सोरमारे, पाथर्डीचे बाळासाहेब कोळसे व राजू तागड, जालना येथील रामराव कोल्हे, जामखेडचे देवीलाल मंडलिक व अंबड येथील भगवान भोजने हे उपोषणाला बसलेले आहेत. स्थानिक नेते अशोक कोळेकर त्यांना मार्गदर्शन करतात. गुरुवारी सकाळी सोरमारे व कोळसे हे शौचालयास जात असल्याचे सांगून उपोषणस्थळावरून गेले ते परतलेच नाहीत. नंतर सोरमारे यांच्या गाडीत चिठ्ठी सापडल्याचे कळल्याने त्यांनी जलसमाधी घेतल्याचा संशय निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने शोधपथक बोलावले व त्यांना येण्यास उशीर लागला. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी नगर-संभाजीनगर महामार्ग ४ तास रोखून धरला. या मार्गावर १५ किमीपर्यंत वाहनांचा रांगा लागल्या होत्या. फोन केला, स्टेटस ठेवले... आमचा शेवटचा ‘जय मल्हार’ घ्यावा ‘आम्ही जलसमाधी घेत आहोत, याला सरकार जबाबदार’ असा मजकूर चिठ्ठीत लिहिला होता. त्यावर सोरमारे व कोळसे यांची सही आहे. कोळेकर यांना सोरमारेंचा सकाळी आठ वाजता फोन आला. ‘आजचे सगळे पेपर वाचायला आणा’ असे त्यांनी सांगितले. ९ वाजता सोरमारे यांनी राहुल नजन या कार्यकर्त्याला फोन केला. यात हा आमचा शेवटचा जय मल्हार असे त्यांनी सांगितले. तर बाळासाहेब कोळसे यांनीही मोबाइलवर ‘शेवटचा जय मल्हार’ असे स्टेटस ठेवले. “आम्ही असू नसू, आता तुम्हाला बापू बिरू होण्याची वेळ आली, या सरकारमुळे. आम्ही जलसमाधी घेत आहोत. आमचा शेवटचा जय मल्हार’, असे प्रल्हाद सोरमारे, बाळासाहेब कोळसे या आंदोलकांनी स्टेटसवर नमूद केले होते. पाच वर्षांपूर्वी इथेच मराठा आरक्षणासाठी जलसमाधी पाच वर्षांपूर्वी मराठा आरक्षणासाठी याच नदीपात्रात काकासाहेब शिंदे यांनी याच ठिकाणी गोदावरीत उडी घेत जलसमाधी घेतली होती. त्याची आठवण सर्वांना आली. ‘आता मराठा आरक्षण मिळणार नाही’ असा फोन करत दांपत्याने घेतले विष लातूर/अहमदपूर | मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. आता मुलांना आरक्षण मिळणार नाही, असा नातेवाइकांना फोन करून लातूर जिल्ह्यातील एका दांपत्याने विष घेतले. अहमदपूर तालुक्यातील हासरणी गावात बुधवारी रात्री ही घटना घडली. ज्ञानोबा तिडोळे (३८), चंचलाबाई तिडोळे (३४) या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून अहमदपूरमध्ये उपचार सुरू आहेत. ज्ञानोबांकडे २ एकर शेती आहे. त्यात सोयाबीन लावले आहे. शेतीसोबत दोघेही शेतमजुरीचीही कामे करतात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. अहमदपूर येथे जयराम पवार यांनीही जरांगेंच्या समर्थनार्थ उपोषण सुरू केले होते. ज्ञानोबा रोज तिथे जात. जरांगे उपोषणाला बसल्यामुळे आता तरी सरकार आरक्षण देईल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु जरांगे यांनी उपोषण सोडले, पाठोपाठ अहमदपूरचे उपोषणही मागे घेण्यात आले. त्यामुळे ज्ञानोबा नैराश्यात होते. बहीण म्हणाली, लेकरांचे काय हाेणार याची चिंता... ज्ञानोबांची बहीण इंदुबाई हेंडगे यांनी सांगितले, ‘बुधवारी रात्री ८.३० वाजता माझा भाऊ ज्ञानोबा याने मला फोन केला. आपल्याला आता आरक्षण मिळणार नाही. मग आपल्या लेकराबाळांचे काय होणार? आम्ही दोघे विष घेत आहोत, असे त्याने सांगितले. त्यामुळे आम्ही घाबरून तातडीने त्याच्या घराकडे गेलो. घरी पोहोचलो तेव्हा पती-पत्नी बेशुद्ध होते. त्यांना तातडीने अहमदपूर येथे दवाखान्यात दाखल केले आहे. दोघांचीही प्रकृती चिंताजनक अाहे.’

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article