मोठी बातमी:मंत्रालयातील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न, अज्ञात महिलेने पाटी देखील काढून फेकली

2 hours ago 1
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला आहे. काल संध्याकाळी उशिरा ही घटना घडल्याची माहिती आता समोर आली आहे. एका अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच्या बाहेर असलेली पाटी देखील फोडून फेकली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची आता गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालयातील कार्यालयात ही घटना घडली आहे. काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या पावसामुळे सर्व कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची घाई होती. त्याच वेळेस एक अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरील पार्टी काढून फोडून फेकून दिली. त्यानंतर ही महिला फडणवीस यांच्या कार्यालयात देखील घुसली. या महिलेने कार्यालयातील झाडांच्या कुंड्या देखील फोडल्या. ही महिला जोरात आरडाओरोड करत असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र या मागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. त्यानंतर ही महिला तेथून पसार झाल्याची माहिती देखील मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीचे केंद्रबिंदू आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांचे शाब्दीक हल्ले वाढले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील मराठा आरक्षण, धनगर आरक्षण तसेच ओबीसी आरक्षणातील नेते देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर झालेल्या या हल्ल्यामुळे या विषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... नाशिक, पालघर, धुळ्यात आज ऑरेंज अलर्ट:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिजोरदार तर जळगावमध्ये मध्यम पावसाचा अंदाज नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज अतिजोरदार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार, मुंबईत मध्यम, नगर, जळगावमध्ये हलका ते मध्यम, पुणे, साताऱ्यात जोरदार तर विदर्भात केवळ ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा... अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नाही:तर शिंदेंना मिळालेली मते भाजपची असल्याची संजय राऊत यांची टीका अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नसल्याचे उद्धव ठाकरे गटाची खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपने राज्याच्या तक्तावर तकलादू माणसे बसवले असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगजेबाप्रमाणे शहा देखील महाराष्ट्रावर आक्रमण करत असल्याचे ते म्हणाले. मात्र, महाराष्ट्र सगळ्यांचा माज उतरव होतो, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. पूर्ण बातमी वाचा... महाराष्ट्रात सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो!:उद्धव ठाकरे गटाची जहरी टीका; शहांच्या वक्तव्यांवरुन साधला निशाणा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील. अशी टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article