रश्मी शुक्ला यांच्यासारख्या वादग्रस्त अधिकाऱ्यांना हटवा:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

3 hours ago 1
राज्याच्या पोलिस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला यांची कारकीर्द ही संशयास्पद आणि वादग्रस्त आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या निष्पक्षपातीपणे पार पाडायच्या असतील तर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांच्यासारख्या वादग्रस्त अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पटोले म्हणाले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम आणि डॉ. गजानन देसाई यांचा समावेश होता. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 24 सप्टेंबरला मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्राची प्रत आज पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी त्यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली. रश्मी शुक्ला भाजप युती सरकारला अनुकूल - पटोले यासंदर्भात टिळक भवनात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले- रश्मी शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही भाजपा युती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्या भाजपा युती सरकारला अनुकुल अशी भूमिका घेऊन मदत करत असतात, असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत, अन्यथा निवडणूक निष्पक्ष होणार नाही, अशी मागणी काँग्रेसने केली असून निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात गृहमंत्रीच सुरक्षित नाही- पटोले पुढे बोलतांना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात स्वतः गृहमंत्रीच सुरक्षित नाही. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्रालयातील गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली व गृहमंत्र्यांच्या नावाच्या पाटीची फेकली. राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल, तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. अवकाळी पावसाप्रमाणे भाजप-युती सरकारही अवकाळी पटोले म्हणाले- पावसामुळे राज्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून 73 टक्के भागात ओला दुष्काळ आहे. गेल्या तीन चार दिवसांत 33 हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. शेतकरी संकटात आहे पण सरकारने अद्याप मदत दिलेली नाही. मुंबईतील नालेसफाईच्या कामात जातीने लक्ष घातल्याने मुंबई तुंबणार नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एका कार्यक्रमात केला आणि संध्याकाळी झालेल्या पावसात मुंबई तुंबली. मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. अवकाळी पावसासारखे भाजपा युती सरकारही अवकाळीच आहे. विकासाच्या नावावर कोट्यवधींची उधळपट्टी ते म्हणाले- भाजपा युती सरकारने विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे, विकास कुठेच दिसत नाही पण निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये सरकारची स्वच्छ व विकास केल्याची प्रतिमा मीडियातून दाखवण्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्यामार्फत मीडियाच्या प्रमुख व्यक्तींना बोलावून टार्गेट दिले जात आहे. यासाठी एमएसआरडीसी, एमएमआरडीए, म्हाडा, सिडको, प्रदूषण महामंडळ, एसआरए यांचा पैसा वापरला जात आहे. राज्य सरकारच्या विविध महामंडळावर हजारो कोटींचे कर्ज आहे. महामंडळे 50 हजार कोटी रुपये तोट्यात आहेत हे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. सरकारकडे पैसे नसताना या महामंडळाचा पैसा वापरून कोट्यवधींची उधळपट्टी सुरु आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article