मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यानिमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी जगभर पसरलेल्या मराठी भाषिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच आता केंद्र सरकारने महाराष्ट्राकडून जे उद्योग पळवले आहेत ते परत द्या असा टोलाही लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, गेल्या कित्येक वर्षांचा मराठी भाषिकांचा लढा, मागल्या अनेक सरकारांचा केंद्रासोबतचा पत्र व्यवहार, मविआ सरकारच्या काळात केलं गेलेलं दस्तावेजीकरण आणि तमाम मराठी मनांच्या तीव्र इच्छाशक्तीपुढे अखेर केंद्र सरकार झुकलं आणि निवडणुकांच्या तोंडावर का होईना आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळाला! जगभर पसरलेल्या मराठी भाषिकांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्याचवेळी केंद्राला एक आठवण, आता महाराष्ट्राचे पळवलेले उद्योगही परत आणा, मराठी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवा आणि मराठी माणसाच्या हक्काची ‘गिफ्ट सिटी’ मुंबईला परत द्या! असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
गेल्या कित्येक वर्षांचा मराठी भाषिकांचा लढा, मागल्या अनेक सरकारांचा केंद्रासोबतचा पत्र व्यवहार, मविआ सरकारच्या काळात केलं गेलेलं दस्तावेजीकरण आणि तमाम मराठी मनांच्या तीव्र इच्छाशक्तीपुढे अखेर केंद्र सरकार झुकलं आणि निवडणुकांच्या तोंडावर का होईना आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 3, 2024