अजित पवार यांची साथ दिल्याने माझे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न:धनंजय मुंडे यांचा आरोप; निवडणुकीत जागा दाखवण्याचा इशारा

1 day ago 1
छोटे पवार अर्थात अजित पवारांची साथ दिल्यामुळे माझे वैयक्तिक व सामाजिक राजकारणाचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. पुण्यात राहणाऱ्या परळीच्या विद्यार्थी आणि नागरिकांनी बालगंधर्व रंगमंदिरात एक स्नेह मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, छोट्या पवारांसोबत राहिलो म्हणून माझ्या व्यक्तिगत आणि सामाजिक राजकारण अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते आणखी प्रयत्न करत राहतील. पण जनतेने माझ्या सोबत राहावे. मग बाकीच्या गोष्टी मी पाहून घेईल. मी काही कारणास्तव बाजूला गेलो, तर माझे अख्खे राजकारण संपवले जात आहे. मी कधी कोणाची जात काढली नाही, पण माझ्यामुळे काहीजण आज जात काढत आहेत. मी कोणाला कधीच घाबरत नाही. कारण जनतेसाठीचे माझे काम प्रामाणिक आहे. ज्यांनी अस्तित्व संपवणे प्रयत्न केला त्यांना आम्ही निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ. या स्नेह मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष दीपक मानकर, समीर चांदेरे, महादेव डोईफोडे, अजय मुंडे, राजपाल लोमटे , विठ्ठल सानप उपस्थित होते. बीड आणि परळी येथील विद्यार्थ्यांसाठी पुण्यात हॉस्टेल निर्माण करण्यात यावे, विद्यार्थी मित्र योजनाद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यात यावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. धनंजय मुंडे म्हणाले, मी 12 वी नंतर परळीमध्ये कृषी शिक्षण घ्यावे असे वडिलांना वाटत होते. तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना वाटत होते मी डॉक्टर झाले पाहिजे. पण माझी इच्छा होती की, पुण्यात येऊन वकील व्हावे. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पुण्यात आलो. राज्यभरातील मित्र माझे याठिकाणी झाले. जीवनात कधी जातपात, धर्म, पंथ मला शिवले नाही. राजकारणात कधी कोणाशी टोकाचे वैर झाले नाही. मी किंवा माझ्या वडिलांनी गोपीनाथ मुंडे यांच्या सारखे राजकारणात येऊन मोठे व्हावे ही इच्छा ठेवली नाही. मुंडे साहेब यांच्यासाठी मी राजकारणात आलो. ते माझ्यासाठी मिशन आहे. प्रत्येकजण राजकरणात यशस्वी होईल ज्यावेळी राजकारण समाजसेवासाठी करेल. आमचे संघर्षाचे राजकारण आहे. जनतेचे जोपर्यंत प्रेम माझ्या सोबत आहे तोपर्यंत कोणी माझे घराचे, जातीचे काढले तरी काही होऊ शकत नाही. बीड जिल्ह्याला विचारत घेतल्याशिवाय राज्याचे राजकारण होऊ शकत नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article