जागावाटपावर ठाकरे गटाचा नरमाईचा सूर:आम्ही दोन पाऊले मागे घेतो, काँग्रेसनेही दोन पाऊले मागे घ्यावीत, सुषमा अंधारे यांचे आवाहन

2 hours ago 1
जागावाटपाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बेबनाव निर्माण झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी शुक्रवारी दिवसभर राजकारण रंगल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना काँग्रेसला दोन पाऊले मागे जाण्याचे आवाहन केले. कुटुंबातील लहान बहीण म्हणून सांगते, आम्ही दोन पावले मागे जातो, तुम्हीही दोन पाऊले मागे घ्या. किमान बैठकीला बसून तर राहा. मधातच निघून गेले तर चर्चा कशी होईल? असे त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, आमच्या पक्षाकडून जागावाटपाची चर्चा संजय राऊत व अनिल देसाई हे करीत आहेत. त्यांनी काही जागांसाठी आग्रह धरला आहे. पण, हा आग्रह अनाठायी नाही. जिंकण्याचा विश्वास असलेल्या जागांवरच त्यांनी दावा केला आहे. रामटेकची जागा आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी सोडली होती. तिथे तर विद्यमान खासदार आमच्या पक्षाचा होता. पण त्यानंतरही आम्ही मनाचा मोठेपणा दाखवून काँग्रेससाठी जागा नुसती सोडलीच नाही. तर शिवसैनिकांनी प्रचार करून ती निवडूनही आणली. काँग्रेसचे दिल्लीतील नेते आमची बाजू समजून घेतील आमचे नेते संजय राऊत आग्रही आहेत, कारण आमची तिथे ताकद आहे. कामठी, रामटेकमध्ये निवडून येण्याची क्षमता आहे म्हणून त्या जागांसाठी आम्ही आग्रह धरला आहे. दर्यापूर, बडनेरा, वाशीम या ठिकाणी विनिंग आमदार होते. या प्रकरणी थोडे मागे पुढे होईलच. या प्रकरणी दोन पावले आम्ही मागे सरकतो, दोन पावले काँग्रेसने सरकावे. दिल्लीतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेस नेते राहुल गांधी ही गोष्ट समजून घेतली असे वाटते, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांचा चेहरा मोठा आहे. तर महाराष्ट्रात तेवढाच महत्वाचा चेहरा उद्धव ठाकरे यांचा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा चेहराही आश्वासक आहे. निवडणुकीत सर्वच चेहरे चालतात. मी निवडणूक लढण्यापेक्षा पक्षासाठी काम करावे. ताकदीने प्रचार सभा घ्याव्यात अशी पक्ष नेतृत्वाची इच्छा इच्छा आहे, असेही सुषमा अंधारे यांनी यावेळी स्पष्ट केले. आमच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे लायक चेहरे आपण मेहनत केलेली, पक्षाची ताकद असलेली जागा मिळावी असे वाटणे साहजिक आहे. पक्षाचे पदाधिकारी रिपोर्ट पाठवतात. अनिल देसाई हे भूमिका मांडतात, आमचे नेते राऊत हे पक्षाच्या हिताचे निर्णय घेतात व बोलतात. त्यावर वेगळे काही करायची गरज नाही. आमच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे चांगले चेहरे आहेत आणि म्हणून माध्यमे त्याकडे लक्ष देत आहेत. आमच्याकडे योग्य व लायक चेहरे आहेत. पण भाजपने आपली अवस्था बघावी. विनोद तावडे यांनी फोटो पोस्ट केला, त्यात नड्डा हात जोडत आहेत. त्यातून बावनकुळे, फडणवीस आणि भाजपाची ताकद लक्षात येते, असा टोला अंधारे यांनी हाणला. पहाटेचा शपथविधी 23 नोव्हेंबरला झाला होता. यंदा निवडणुकीचा निकालही 23 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा हिशोब जनता व्याजासकट चुकता करील, असा दावाही सुषमा अंधारे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article