आपत्तीजनक वक्तव्य केल्याने कारवाई करा; वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घ्या, कुल जमाअती तन्जीमची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

6 days ago 4
आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा, वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घ्या, यासह विविध मागण्यांसाठी कुल जमाअती तन्जीमतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कुल जमाअती तन्जीमतर्फे रागगिरी, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यती नरसिंहानंद व भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाईसाठी निवेदन देण्यात आले. या तिघांनी धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून अटक करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच लोकसभेत मांडण्यात आलेले वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घेण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. हे विधेयक म्हणजे वक्फची मालमत्ता हडप करण्याचा डाव आहे, असा आरोप यापूर्वीच जमाअत-ए- इस्लामी हिंदने केला होता. वक्फ संरक्षण आणि पारदर्शकतेच्या नावाखाली वक्फ मालमत्ता पाडण्याचा आणि बळकावण्याचे कारस्थान आहे, असे जमाअत-ए- इस्लामी हिंदचे म्हणणे आहे. प्रस्तावित विधेयकात वक्फची व्याख्या, मुतवल्लीचा दर्जा आणि वक्फ बोर्डाचे अधिकार यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. याच मुद्यावर लकडगंज अब्दुल हक फंक्शन हॉलमध्ये विधेयकाच्या जागृतीबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article