जिल्ह्यातील 12 पैकी 8 जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा, श्रीगोंदेसाठी राहूल जगतापांना शरद पवारांकडून उमेदवारीचे संकेत‎

2 hours ago 2
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते, आणखी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दावा केलेला आहे. याच जागांवर काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) पक्षाकडूनही दावा होत असल्याने, जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचे आव्हान तीनही पक्षासमोर आहे. त्यातच आता ज्येष्ठ नेते शरद पवारांनी अकोलेत अमित भांगरे यांच्यानंतर श्रीगोंदेतून राहूल जगताप यांना उमेदवारीचे संकेत देऊन तयारीला लागण्याचे कळवले आहे. राज्यातील सत्तापालटानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) या तीनही पक्षांनी एकीची मोट बांधून भाजप, शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी महायुतीविरूद्ध लोकसभा लढवली. आता विधानसभेसाठी राज्यातील २८८ जागांपैकी १२ जागा अहमदनगर जिल्ह्यात आहेत. या जागांवरील २०१९ चे विद्यमान आमदारांचे बलाबल पाहता, राष्ट्रवादीकडे सहा, काँग्रेसकडे दोन, भाजपकडे तीन व नेवासेत शंकरराव गडाखांच्या रूपाने शिवसेना (ठाकरे) गटाकडे आहे. जागा वाटपात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अकोले, कोपरगाव, नगर शहर, राहुरी, कर्जत-जामखेड व पारनेरवर दावा कायम ठेऊन, २०१९ मध्ये थोड्या फरकाने पराभूत झालेल्या श्रीगोंदे व शेवगाव पाथर्डीसह आठ जागांवर दावा केला आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचा उर्वरित पान ४ साकळाई प्रश्न जगतापांनी सोडवावा या प्रसंगी पवार साहेबांकडे श्रीगोंदे तालुक्यातील साकळाई योजना व डिंबे बोगदा याबाबत निवेदन देण्यात आले.तेव्हा पवार साहेबांनी सांगितले की असे निवेदन देऊन काम होणार नाही तर राहुल तू आमदार झाल्यावर निवेदन घेऊन ये, तुझ्या अधिकारात काम कर, असे सांगितले. प्रतिनिधी | श्रीगोंदे श्रीगोंदेच्या दौऱ्यावर असताना काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी साजन पाचपुतेंना उमेदवारीचे संकेत दिले होते. तर घनशाम शेलार यांनी श्रीगोंदेची जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. अशातच राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी आमदार राहूल जगतापांना उमेदवारीचे संकेत देऊन श्रीगोंदेकरांना तयारीला लागण्याचे शनिवारी सांगितले. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीतील इतर इच्छुकांची कोंडी झाली असून, शिवसेना व काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. उर्वरित पान ४ जागावाटपाची तडजोड कशी ? यापूर्वी पारनेरमधून विजय औटी तसेच नगर शहरातून शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड आमदार राहिले आहेत. त्यामुळे या जागांवर शिवसेनेचा प्रबळ दावा आहे. २०१९ मध्ये पारनेर व नगरच्या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. विद्यमान आमदारांच्या सूत्रानुसार पारनेरची जागा राष्ट्रवादी (पवार) सोडायला तयार नाही. परंतु, तडजोडीत नगरची जागा शिवसेनेकडे जाऊ शकते, असा तर्क चर्चेत आहे. पण अंतिम जागावाटप झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article