परतीच्या पावसाने घाटनांद्रा परिसरातील मका, कापूस पिकाचे नुकसान:शेतकरी अडचणीत, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

1 day ago 1
घाटनांद्र्यासह परिसरात परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला आहे. मका, कापूस, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण पिके पाण्यात गेली आहेत. या पावसामुळे पिकाची पुरती वाट लागली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातून आता ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घाटनांद्र्यासह परिसरातील धारला,चारणेर,पेंडगाव ,वाडी आदी परिसरात परतीच्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून मोठा कहर केला. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांनी शेतात सोंगणी करुन ठेवलेल्या मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कपाशीला फुटलेला कापूस ओला होऊन कापसाच्या वाती झाल्या आहेत. सध्या येथे ऑक्टोबर हीटऐवजी सकाळी ऊन पडते व दुपारी आभाळ भरून येऊन मुसळधार पाऊस पडतो असे वातावरण या परिसरात पसरले आहे. जमिनीतील सतत ओलाव्यामुळे बुरशीजन्य आजाराने कापसाच्या झाडावरील फुलभवरी व कापूस खाली गळून पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना परतीचा पाऊस नुकसानकारक ठरत आहे. रोज मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतातून नदीसारखे पाणी वाहत आहे. संपूर्ण शेतशिवारामध्ये पाणीच पाणी साचले आहे. विहिरीदेखील काठोकाठ भरल्या आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी येथील संजय मोरे, गोविंदा मोरे, संतोष मोरे, भगवान मोरे, खुशाल पंडित,जगन्नाथ चौधरी, गणेश मालोदे आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे. घाटनांद्रा परिसरात परतीच्या पावसाने मका पिक पाण्याखाली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article