Parbhani News | ऐन दिवाळीच्या तोंडावर निर्जळी
परभणीत तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.File Photo
Published on
:
18 Oct 2024, 11:16 am
Updated on
:
18 Oct 2024, 11:16 am
परभणी : शहराच्या पाणीपुरवठा योजनेतंर्गत धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रात बांधण्यात येणारा ८० लाख लिटर एसयूएमपी हा जुन्या एसयूएमपीला जोडण्यात येणार असल्याने दि. २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच हे काम होत असल्याने नागरिकांना निर्जळीस तोंड द्यावे लागणार आहे.
अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रात बांधण्यात येणारा ८० लाख लिटरचा एसयूएमपी हा जुन्या एसयूएमपीला जोडण्याचे काम मनपाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे येलदरी धरणातून धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी धर्मापुरीतून शहरातील खाजा कॉलनी, विद्या नगर डोम, विद्यानगर नवीन जलकुंभ, शिवनेरी जलकुंभ, अमेय नगर, खंडोबा बाजार, नवा मोंढा, गंगाखेड रोडवरील देवाशिष, कृषीनगर, चष्मेहयात विहरी जवळील जलकुंभ व दर्गा जलकुंभ याठिकाणच्या सर्व जलकुंभांना पाणी पुरवठा होणार नाही.
या सर्व जलकुंभांवरून शहराच्या विविध भागात करण्यात येणारा पाणीपुरवठा दि.२१ ते २३ दरम्यान बंद राहणार आहे. या कामामुळे शहरातील पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करून त्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.