भाजपच्या प्रचारासाठी संविधानाचा चुकीचा वापर:न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यावरून संजय राऊत बरसले; हातात तलवार ऐवजी संविधान दिल्यावरूनही टीका

1 day ago 1
लोकसभा निवडणुकीत भारतातील जनतेने मोदींचे बहुमत काढून टाकले. त्यावेळी संविधान वाचवण्याचा लढा आम्ही दिला होता. त्यामुळेच आता न्यायालयातील काहींनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीत काढून टाकली असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता न्यायदेवता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहणार आहे, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढून संविधान देण्यात आले आहे. हा भाजपचा प्रचार असून आएसएसचा अजेंडा असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. देशात सर्वात जास्त शिवसेनेवर अन्याय झाला आहे. गेल्या दहा वर्षात न्यायदेवता न्याय देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. न्यायदेवतेच्या हातात संविधान देणे हा आरएसएसचा अजेंडा असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सर्वांना समान न्याय देण्यासाठी न्याय देवतेच्या हातामध्ये तलवार देण्यात आली होती. मात्र, आता गेल्या दहा वर्षात देशात न्याय होत नसल्याने तलवार काढून टाकण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात गेली अडीच वर्षात संविधानाविरोधात सरकार चालते. मात्र, तरी देखील न्यायालयाने न्याय दिला नाही. त्यामुळे न्यायदेवतेवरचा विश्वास उडाला असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. ईव्हीएम मध्ये घोटाळा होत आहे. या देशातील जनतेचा विश्वास ईव्हीएमवर राहिला नाही. तरी देखील न्यायालयाने न्यायालयाने ईव्हीएमला क्लीन चिट दिली आहे. संविधानाचा चुकीचा वापर करून भाजपचा प्रचार केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता न्यायालयातीलच काही लोक हे भाजपचे काम करत असल्याचा आरोप देखील आहे. संजय राऊत यांनी काल देखील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर गंभीर आरोप केले होते. राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... लाडकी बहीण योजना हलक्यात घेऊ नका:सरकार आल्यास दीड ऐवजी 3 हजार देऊ असे सांगा; श्याम मानव यांचा आघाडीच्या नेत्यांना सल्ला विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हलक्यात घेऊ नका, या योजने विरोधात न बोलता महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिलांना दीड हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये देऊ, असे सांगा, असा सल्ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. पूर्ण बातमी वाचा... मतदारांना विकत घेण्याचा युतीचा प्रयोग:तर न्यायालये देखील कोणाची तरी ‘जी हुजुरी’च करत आहेत; उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल पुढील महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील व त्या सध्याच्या भ्रष्ट तसेच घटनाबाहय़ सरकारविरुद्ध ईर्षेने लढवल्या जातील. महाराष्ट्र राज्याची इभ्रत ईरेला लागली आहे व मऱ्हाठी जनता पेटून उठली आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर घडविण्यासाठीच या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली. दिल्लीवाल्यांची सोय पाहूनच आता निवडणुकांच्या तारखा घोषित होतात. तशा त्या महाराष्ट्रातही झाल्या. युद्धाचे रणशिंग फुंकले गेले आहे. महाराष्ट्रासाठी हा लढा जिंकू किंवा मरू असाच आहे, पण हरण्याचे नावच नको. लढू आणि जिंकू. जिंकावेच लागेल! असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article