मुख्यमंत्री होण्यासाठी खूप उठा-बशा काढाव्या लागतात:जयंत पाटील यांचे सूचक विधान; 'एक फुल दोन हाफ' म्हणत महायुती सरकारवर निशाणा

1 day ago 1
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे सूचक विधान केले आहे. केवळ घोषणाबाजी केल्यामुळे कुणी मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी खूप उठा-बशा काढाव्या लागतात, असे त्यांनी यासंबंधी आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचत म्हटले आहे. जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता संघर्षासाठी तयार झाला आहे. आमचा पक्ष फुटला तेव्हा आम्हाला आमच्याकडे प्रचारासाठी कुणीही राहिले नसल्याचे हिणवले जात होते. पण शरद पवार या नावाचे वलयच वेगळे आहे. पुढे अनेक गोष्टी घडत गेल्या. राज्यात एकही जिल्हा किंवा तालुका नाही की जिथे शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता नाही. राज्याच्या विकासाचा बोजवारा उडाला सद्यस्थितीत आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. एका मतदारसंघातून तर तब्बल 30 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. महाराष्ट्राची राज्यातील सरकार बदलण्याची मानसिकता आहे. कारण, सद्यस्थितीत राज्याच्या विकासाचा बोजवारा उडाला आहे. राज्याचा कणा असणाऱ्या कृषी क्षेत्रात महाराष्ट्र थेट सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. 8 लाख कोटींचे कर्ज झाले आहे. एक फुल दोन हाफ काय करतात? जयंत पाटील पुढे म्हणाले, महायुतीचे लोक सत्ता सोडतील तेव्हा ते महाराष्ट्राच्या डोक्यावर सुमारे 9 लाख कोटींचे कर्ज ठेवून जातील. कायदा सुव्यवस्थेची स्थितीही फार वाईट झाली आहे. आमदारच गोळीबार करत आहेत. त्यामुळे आता गुंडांची गरजच उरली नाही. या सरकारने पोलिसांचे खच्चीकरण केले आहे. माझा बॉस सागर बंगल्यावर बसल्याची वल्गना करत पोलिसांना धमकावले जात आहे. त्यामुळे सरकारमधील एक फुल आणि दोन हाफ काय करत आहेत? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. आपण सर्वांनी महाराष्ट्रातील राजकारणात मला इथपर्यंत आणले. गॉफादर मिळाला की प्रगती होते. माझा गॉडफादर (शरद पवार) माझ्या मागे बसला आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. वागायचे कसे? बोलायचे कसे? शरद पवारांसारखा नेता उभ्या भारतात नाही. मी मुहूर्त पाहतो तेव्हा शरद पवारांना ते आवडत नाही. 24 ऑक्टोबरला मी अर्ज भरेन तेव्हा पाण सर्वजण इथे भेटू. त्यानंतर राज्यभर मला फिरावे लागणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी खूप उठा-बशा काढाव्या लागतात याठिकाणी काही जणांना माझ्या नावाचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला. हे त्यांचे प्रेम आहे. पण अशा घोषणा देऊन कुणी मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी खूप उठाबशा काढाव्या लागतात. ही शिवस्वराज्य यात्रेची शेवटची सभा आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे आपले चिन्ह आहे. ते घरोघरी पोहोचवा. आपल्याला चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार रायगडावर आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हे चिन्ह ठेवले. त्याचवेळी आम्ही शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्याची शपथ घेतली होती, असेही जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले. जयंत पाटील यांनी यावेळी लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजनांवरही निशाणा साधला. लाडकी बहीण व लाडका भाऊ या सगळ्या योजना महायुती सरकारचे पुतना मावशीचे प्रेम आहे. 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या योजना चालतील, असे ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article