लाडकी बहीण योजना हलक्यात घेऊ नका:सरकार आल्यास दीड ऐवजी 3 हजार देऊ असे सांगा; श्याम मानव यांचा आघाडीच्या नेत्यांना सल्ला

1 day ago 1
विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हलक्यात घेऊ नका, या योजने विरोधात न बोलता महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिलांना दीड हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये देऊ, असे सांगा, असा सल्ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. राज्यातील महायुती सरकारच्या वतीने घोषणा करण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात ही योजना फसवी असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केले होते. त्यानंतर या योजनेचे पैसे आता केवळ निवडणुकीपुरते भेटतील, असे आरोप करण्यात येत आहे. मात्र त्याला महायुती सरकारच्या वतीने देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता पाहता याचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता या योजनेवर टीका न करता लाडक्या बहिणींचे कौतुक करा, या योजनेच्या माध्यमातून आमचे सरकार आल्यास आम्ही महिन्याला दोन हजार रुपये देऊ असे सांगा, लाडक्या बहिणीशी संवाद साधा, असा सल्ला श्याम मानव यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला आहे. काँग्रेस पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात बोलणे झाले असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यास संविधानाचा धोका कमी होईल, असे देखील श्याम मानव यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला होता. सुरुवातीला ही योजना फसवी असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. मात्र महिलांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता केवळ निवडणुकीपूरती योजना असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहे. तर दुसरीकडे ही योजना कधीही बंद होणार नाही, महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत राहतील, असा दावा युतीतील नेते करत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या योजनेचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... मतदारांना विकत घेण्याचा युतीचा प्रयोग:तर न्यायालये देखील कोणाची तरी ‘जी हुजुरी’च करत आहेत; उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल पुढील महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील व त्या सध्याच्या भ्रष्ट तसेच घटनाबाहय़ सरकारविरुद्ध ईर्षेने लढवल्या जातील. महाराष्ट्र राज्याची इभ्रत ईरेला लागली आहे व मऱ्हाठी जनता पेटून उठली आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर घडविण्यासाठीच या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली. दिल्लीवाल्यांची सोय पाहूनच आता निवडणुकांच्या तारखा घोषित होतात. तशा त्या महाराष्ट्रातही झाल्या. युद्धाचे रणशिंग फुंकले गेले आहे. महाराष्ट्रासाठी हा लढा जिंकू किंवा मरू असाच आहे, पण हरण्याचे नावच नको. लढू आणि जिंकू. जिंकावेच लागेल! असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article