शेंगाच नसल्याने शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटावेटर:स्वप्नाचा झाला चुराडा, एकर 15 हजारांचा खर्च पाण्यात

2 hours ago 2
शेंगाच नसल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्याने सोयाबीनवर रोटावेटर फिरवला. एकर १५ हजारांचा खर्च पाण्यात गेला आहे. शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चुराळा झाला असून, शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात जुले व ऑगस्ट महिन्यात सतत पाऊस झाला. परिणामी पिकांची वाढतच खुंटली. अशातच सप्टेंबर महिन्यात दोन दिवस अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले असून, पिकांची मोठ्या प्रमाणात हानी. हे कमी कि काय सोयाबीन पिकाला एकही शेंग आली नसल्याचा प्रकार यापूर्वी बाळापूर, तेल्हारा तालुक्यात पुढे आला. आता मूर्तिजापूर तालुक्यातील जीतापुर खेडकर, ब्रम्ही या गावातही सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नसल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे एका महिन्यात हाती येणाऱ्या पिकावर रोटावेटर चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिकांचे तातडीने सर्वेक्षण करण्याची होतेय मागणी मोठ्या मेहनतीने शेती तयार करून महागडे बियाणे,खते,फवारण्या करून पीक उभे केले. मात्र पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. एकरी १५००० रुपयांचा खर्च वाया गेला. त्यामुळे शासनाने प्रती एकर वीस हजाराची मदत देवून ,पीकविमा देण्यास विमा कंपनीस बाध्य करावे अशी मागणी संकटग्रस्त शेतकरी धम्मा नंद तायडे,राम तायडे,राजू डोंगरे,धम्मापल डोंगरे,रणजित डोंगरे,गजानन घोडेस्वार, जनमंच,प्रगती शेतकरी मंडळाचे प्रमोद खेडकर यांनी केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article