शेतामध्ये रब्बी हंगामातील पेरणी पूर्व मशागतीला वेग ; शासनाने मदत द्यावी

2 hours ago 2
संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाले असून, आता शेतकरी रब्बी हंगामातील पेरणी पूर्व मशागतीकडे वळला आहे. यासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यंदा शेतीसाठी झालेला खर्चही भरून निघणार नाही. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मुग उडीद, आदी पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कुठे सोयाबीनला शेंगाच लागलेल्या नाहीत. शिवाय पिकांवर अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. नापिकीमुळे आता पुढे काय होणार या विवंचनेत शेतकरी असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान बोरगाव मंजू परिसरात रब्बी हंगामातील शेती मशागतीला वेग आला आहे. अल्प प्रमाणात रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय जलसिंचन व्यवस्था अल्पप्रमाणात आहे. खरीप हंगामानंतर शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करून रब्बीच्या हंगामात गुंतल्याचे चित्र आहे. सोयाबीन पिकावर अज्ञात खोड अळी सह प्रादुर्भावामुळे तसेच स्वतःच्या रिमझिम पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे सोयाबीन काढून हरबरा व कांद्याचे उत्पादन होईल, अशी अशा शेतकऱ्यांना आहे. शासनाने मदत करावी ^जलसिंचन व्यवस्था बागायती क्षेत्र नगण्य आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांशिवाय पर्याय नाही. गत काही वर्षांपासून नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटून हतबल झाले आहेत, शासनाने आर्थिक भरीव मदत करावी. - प्रकाश गोतमारे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article