सोयाबीनची प्रतिक्विंटल आठ हजार दराने खरेदी व्हावी:श्रमिक शेतकरी संघटनेची आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी

1 hour ago 1
सोयाबीनची खरेदी पारदर्शकपणे करा, सोयाबीनला प्रतिक्विंटल आठ हजार ८०० रुपये बाजार भाव (किमान आधारभूत किंमत) देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र श्रमिक शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संघटनेने विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले. यंदा कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना फटका बसला. जून महिन्यात पहिले दहा दिवस पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात उघडीप होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मात्र पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. काही दिवसांचा अपवाद वगळल्यास रोज काही ठिकाणी पाऊस पडला होता. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अनेकदा अतिवृष्टी झाली. १० पेक्षा जास्त मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. परिणामी कापूस, सोयाबीन पिकांची हानी झाली होती. दरम्यान आता सोयाबीन खरेदी प्रकरणी श्रमिक शेतकरी संघटनेने मागणी केली आहे. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक देवराव पाटील हागे, संजय मालोकार, विजय वाहुरवाघ, नफिस अहमद, आशा चंदन, प्रदीप वखारीया आदी होते. राज्य सरकारने सोयाबीन एमएसपीने म्हणजेच प्रतिक्विंटल चार हजार ८५० रुपये प्रमाणे खरेदी करण्याचे जाहीर केले. हा दर हा शेतकऱ्यांवर अन्याय असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार सोयाबीनला ८ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल मिळणे आवश्यक आहे. सोयाबीन पिकाचे होणारे एकरी उत्पादन व त्यावर होणारा प्रत्यक्ष उत्पादन खर्च विचारात घेता शेतकऱ्यांना सरकारचा हा एमएसपी दर शेती तोट्याची करण्यास भाग पाडणारा आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जून, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे , सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाला शेंगा न लागल्याचे प्रकार सुद्धा समोर आले. याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर झाला आहे. कोट्यवधींचा फटका जून व जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसला असून, नुकसान भरपाईसाठी १२ कोटी ९० लाख ६४ हजार रुपये मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सतत पाऊस झाला. या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची हानी झाली. मदतीसाठी ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ रुपयांची आवश्यकता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article