विनाअनुदानित शिक्षक आक्रमक; आत्मदहन करणारच! कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज आंदोलन

2 hours ago 6

सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने वाढीव टप्प्याच्या विषयाला बगल दिल्याने विनाअनुदानित शिक्षकांनी उद्या (दि. 25) आत्मदहनाचा इशारा दिला असून, शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ‘आत्मदहन आंदोलन’ केले जाणार आहे.

वाढीव टप्प्याच्या जीआरसाठी 55 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यातील सर्व जिह्यांमधील हजारो शिक्षक आंदोलन करत आहेत.

शिक्षणमंत्र्यांकडून वाढीव टप्प्याचा जीआर काढण्यात येईल. 18 सप्टेंबरला कॅबिनेट आहे, त्यावेळी निर्णय घेतला जाईल, असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, ती कॅबिनेट झालीच नाही. 19 सप्टेंबरचीही कॅबिनेट रद्द झाली. सोमवारच्या कॅबिनेटमध्ये सरकारने वाढीव टप्प्याबाबत कोणताच विषय घेतला नाही. त्यामुळे संतप्त विनाअनुदानित शिक्षक आक्रमक झाले आहेत. सरकारला याआधी शिक्षकांनी मंगळवारपर्यंत (दि. 24) अल्टीमेटम दिला आहे. वाढीव टप्प्याचा आदेश निघाला नाही, तर बुधवारी आत्मदहन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

यावेळी खंडेराव जगदाळे, शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, प्रेमकुमार बिंदगे, सुनील शेंडे, बाळासाहेब पाटील, भारत भामरे, सचिन चौगुले, युवराज पाटील, राजू भोरे, उत्तम जाधव, यशराज गाडे, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे यांच्यासह शेकडो शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

…तर सरकारच जबाबदार

n सभागृहात 12 जुलैला वाढीव टप्प्याची घोषणा झाली आहे. अद्यापही त्याचा जीआर आलेला नाही. वेळकाढूपणा आणि वारंवार रद्द होणाऱया कॅबिनेटमुळे शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये सरकारने वाढीव टप्प्याबाबत कोणताच विषय न घेतल्यामुळे शिक्षकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आम्ही बुधवारी आत्मदहन करणार असून, याला याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article