100 गावांत जलव्यवस्थापनाचा जागर:अटल भूजलच्या माध्यमातून जागृती, ड्रिप, स्प्रिंकलर वापराबाबत माहिती

2 hours ago 1
जिल्हा परिषदेच्यावतीने अटल भूजल उपक्रमांतर्गत १०० गावांत चित्ररथाद्वारे भूजल संवर्धनासह पाणी व्यवस्थापनाबाबत २ ऑक्टोबरपासून आठ दिवस जागृती केली जाणार आहे, त्याचबरोबर शेती सिंचनासाठी मल्चिंग, ड्रिप, स्प्रिंकलरचा प्रभावी वापर करून पाणी व्यवस्थापनाबाबत माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर यांनी दिली. चित्ररथाव्दारे, अटल भूजल योजनेत समाविष्ठ असलेल्या गावांत प्रबोधनाव्दारे गावाची भूजल विषयी स्थिती, प्रत्येक गावनिहाय पाण्याचा ताळेबंद, अटल भूजल योजनेतून साकारलेल्या उपचारांची माहिती तसेच या वर्षीच्या नियोजीत आराखड्यातून प्रस्तावीत कामांची माहिती पोहोचवण्यासाठी भूजल विभागाकडून चित्ररथ पाठवण्यात आला आहे. या रथाला महात्मा गांधी जयंतीनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. अटल भूजल योजनेतील भूजल ग्राम समृध्द स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या ६४ गावांची पुर्वतयारी तसेच क्षमता बांधणी करण्यात येणार आहे. कर्जत, राहता व संगमनेर येथील गांवांची पुर्वतयारी तसेच क्षमता बांधणी करण्यासाठी संवादतज्त्र गणेश पवार मार्गदर्शन करणार आहेत, असे काटकर यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article