Amravati University: अमरावती विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे आंदोलन

2 hours ago 1

विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी

अमरावती (Amravati University) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबिव्हीपी) (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) अमरावती महानगरच्या नेतृत्वाखाली संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात (Amravati University) विविध शैक्षणिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि संबंधित विषयांवर तातडीने कारवाईची मागणी केली.

परीक्षेचे निकृष्ट मूल्यांकन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई, पुनर्मूल्यांकनात पास झालेल्या विद्यार्थ्यांची शुल्क माफी, परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत जाहीर करावेत, विधी शाखेच्या हिवाळी परीक्षेसाठी ९० दिवसांचा कालावधी दिला जावा, नवीन शैक्षणिक धोरणानुसार अद्याप लागू न झालेल्या प्रिंट प्रक्रियेवर तातडीने निर्णय घ्यावा, पुनर्मूल्यांकनासाठी मूळ मार्कशीट जमा करण्याची प्रक्रिया रद्द करावी, नागपूर विद्यापीठाच्या उदाहरणाप्रमाणे, प्रत्येक जिल्हा केंद्रावर एकल खिडकी योजना सुरू करून विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करावा, १४ ऑक्टोबरपासून अनेक परीक्षा सुरू होणार असून, अद्याप पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर झालेला नाही; तो तात्काळ लावावा, पुनर्मूल्यांकनामधे शून्य ते ३५ गुणांपर्यंत वाढ कशी होते, याची सखोल चौकशी करण्यात यावी या काही प्रमुख मागण्यांना धरून हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ प्रांत सहमंत्री संदेश उरकुडे व आर्या पाचखेडे, (Amravati University) अमरावती विभाग संगठन मंत्री योगेशजी शेळके, महानगर मंत्री रिद्धेश देशमुख, अनुराग बालेकर, विदर्भ प्रांत साविष्कार संयोजक अनिकेत पजई, महानगर सहमंत्री तृष्णा चव्हाण, गौरी भारती, विद्यापीठ प्रमुख शिवानी भेंडारकर, मध्यनगर मंत्री आर्यन ठाकरे, गाडगे नगर मंत्री निकेत कलाने, साईनगर मंत्री तेजस पाठक, दस्तूर नगर मंत्री संकेत खेडकर, देव करंजकर, प्रदुमन सागानी, अजिंक्य कावळे, प्रज्वल तायडे, अद्वैत अनासने आणि अन्य विद्यार्थी प्रतिनिधींनी केले. या (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) आंदोलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपला रोष व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या या सर्व मागण्यांवर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांचे व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगरराचे म्हणणे आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article