अनुशक्तीनगरमधून निवडणूक लढवणार:आमची पूर्ण तयारी झाली, पक्षाने उमेदवारी जाहीर करणेच बाकी- सना मलिक

1 hour ago 1
सना मलिक या अनुशक्तीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. आमची निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून पक्षाने उमेदवारी जाहीर करणेच बाकी आहे, असे सना मलिक यांनी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान अनुशक्तीनगर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे त्यांचे वडील नवाब मलिक आहेत. ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते मंत्री ही होते. मात्र दाऊद बरोबर संबध असल्याच्या आरोपावरून त्यांना जेलमध्ये जावे लागले होते. या मुद्द्यावरुनच त्यांना भाजपने विरोध केला. मलिकांना दोन मतदारसंघ मिळण्याची शक्यता भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्राद्वारे मागणली केली होती की नवाब मलिक यांना पक्षात घेऊ नका. मात्र, अजित पवारांनी त्याकडे दुर्लक्ष करत नवाब मलिकांना स्वत:च्या पक्षात घेतले. अजित पवारांनी नवाब मलिक यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. त्यांना शिवाजी नगर - मानखूर्द मतदार संघातून निवडणूक लढण्यास सांगितले आहे. तर त्यांची मुलगी सना मलिक यांना अनुशक्तीनगरमधून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे. मुलींसाठी मतदारसंघ सोडणार 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत अणुशक्तीनगर मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून अणुशक्तीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत आतापर्यंत होत आली आहे. मुंबईतील अणुशक्तीनगर आणि मानखुर्द-शिवाजीनगर या दोन जागा अजित पवार गटाला मिळविण्याचा पक्षाकडून प्रयत्न आहे. 2014 च्या निवडणुकीत कातेंनी मलिकांचा पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत नवाब मलिक पुन्हा विजयी झाले होते. या मतदारसंघावर पकड असल्याने मलिक यांनी इथून आपली मुलगी सना मलिक यांना उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. सना मलिकांना प्रवक्तेपद नवाब मलिक हे अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्या उमेदवारीला भाजपचा आक्षेप असणार हे गृहित धरूनच अजित पवारांनी अणुशक्तीनगर भागात झालेल्या जाहीर सभेत मलिक यांची कन्या सना मलिक-शेख यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली. तेव्हापासून सना मलिक उमेदवार असणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली होती. फडणवीसांचे पत्र काय? सत्ता येते आणि जाते, पण... देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणाले की, सत्ता येते आणि जाते, पण देशख महत्त्वाचा आहे. नवाब मलिक यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाही तर आपण त्यांचे स्वागत करावे. नवाब मलिक यांना सध्या केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाला आहे, त्यांची निर्दोष मुक्तता झाली नाही. या स्थितीत त्यांनी महायुतीत राहणे योग्य ठरणार नाही. तथापि, आमचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक शत्रूत्व नाही. पण त्यांच्यावर असे् आरोप होत असताना त्यांना आपल्या आघाडीचा भाग बनवणे योग्य ठरणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. पत्र लिहण्याची गरज नव्हती- वळसे पाटील दिलीप वळसे पाटील म्हणाले की, नवाब मलिक कुठे आहेत, हे पक्षाने ठरवायचे आहे. ते सत्ताधोारी बाकावर बसलेत. त्यामुळे ते आमच्या बाजूने आहेत. एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना पाठिंबा दिला. ती त्यांची भूमिका आहे. आम्ही आमची भूमिका ठरवून. पण फडणवीस यांनी असे खुले पत्र लिहिणे गरजेचे नव्हते, असे वळसे पाटील यांनी या प्रकरणी म्हटले आहे. मलिक अल्पसंख्यकांचे बडे नेते नवाब मलिक यांची अल्पसंख्यक समुदायामध्ये शानदार प्रतिमा आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळेच राष्ट्रवादीने काँग्रेसच्या मुस्लिम व्होटबँकेला थेट हात घालता आला. नवाब मलिक मुंबईतील अणुशक्ती नगर मतदारसंघाचे आमदार आहेत. तब्बल 5 वेळा विधानसभेवर पोहोचलेत. ते आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article