अभिजात दर्जामुळे देशभरातील 450 विद्यापीठांत मराठीचे अध्ययन शक्य

2 hours ago 1

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीतून संशोधन करण्यास अधिक वाव मिळेल. मराठी ही ज्ञानभाषा होण्यास मदत होईल. देशभरातील 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय उपलब्ध होऊ शकेल. तरुणांना मराठीकडे वळविण्यासाठी अनेक प्रकल्पही राबविता येतील, अशी प्रतिक्रिया लेखक - साहित्यिकांनी व्यक्त केली. मराठी भाषेला गुरुवारी अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्याचे काय सकारात्मक परिणाम होतील, याबाबत दै. ‘पुढारी’ने त्यांच्याशी संवाद साधला.

डॉ. राजा दीक्षित (ज्येष्ठ साहित्यिक) : प्रत्येक मराठी व्यक्तीनेही आपली स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठीची शब्दसंपत्ती वाढवणे, ज्ञान-विस्फोटाच्या सध्याच्या युगात जे नवे ज्ञान जगभरात निर्माण होत आहे, ते मराठीच्या प्रांगणात आणणे, त्यासाठीची परिभाषा घडवणे, प्रमाणभाषेला बळकटी आणणे, मराठीच्या विविध बोली टिकवणे व त्यांचा विकास घडवणेे आणि इंग्रजीत शिकणार्‍या मराठी मुलांना घरामध्ये मराठी संस्कृती आणि मराठी भाषा यांच्या वातावरणात वाढवणे, हे सगळे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच यासंदर्भात मी स्वतः मराठीसाठी काय करतो / करते, याचा विचार प्रत्येक मराठी व्यक्तीने केला पाहिजे, असे मला वाटते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article