मोदींना देवेंद्र फडणवीसांवर विश्वास उरला नाही:त्यांना फडणवीस यांची नकारात्मक प्रतिमा भाजपला बुडवेल की काय? अशी भीती -सुषमा अंधारे

2 hours ago 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वावर भरवसा राहिला नाही. त्यामुळे त्यांना स्वतःच महाराष्ट्रात लक्ष घालावे लागत आहे, अशी खोचक टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी फडणवीसांवर निशाणा साधताना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेत. सुषमा अंधारे यांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. तेव्हापासून हा भगवा पक्ष अलर्ट मोडवर आला आहे. भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात यश मिळणे कठीण वाटत आहे. फडणवीस यांची नकारात्मक प्रतिमा पक्षाला बुडवेल की काय? अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळेच आता मोदींना त्यांच्यावर विश्वास उरला नाही. सुषमा अंधारे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 2014 व 2019 सारखा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकू शकत नाहीत. त्यामुळे ते स्वतः जातीने महाराष्ट्रात प्रचार करत आहेत. त्यांना स्वतः इथे राज्यात लक्ष घालावे लागत आहे. त्यांच्यावर सातत्याने महाराष्ट्रात येण्याची वेळ आली आहे. पण आम्ही याकडे सकारात्मकतेने पाहत आहोत. कायदा सुव्यवस्था अत्यंत हलाखीची सुषमा अंधारे यांनी यावेळी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरूनही फडणवीस यांना धारेवर धरले. त्या म्हणाल्या, मागील 48 तासांत पुण्यात 3 महिला अत्याचाराच्या घटना घढल्या. गत 7 महिन्यांत बलात्काराच्या 265 घटना घडल्या. विनयभंगाचे 700 गुन्हे घडले. त्यामुळे पुण्याची प्रतिमा डागाळण्यासाठी कोण कारणीभूत आहे. पोलिस प्रशासन अशा बातम्या कव्हर करू देत नाही. त्यामुळे त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुण्यात ललित पाटील, ड्रग्जची साठेबाजी, आंधळकर प्रकरण आदी अनेक घटना घडल्या. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था हलाखीची झाली आहे. पण गृहमंत्र्यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. ते केवळ घोषणाबाजी व जाहिरातबाजीत व्यस्त आहेत. त्यामुळे आमचे संरक्षण आता आई अंबाबाईच करेल. मराठी शाळा वाचवण्याची गरज सुषमा अंधारे यांनी यावेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयात आपल्या पक्षाचाही हातभार असल्याचे यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. त्यानंतर त्यांनी त्या राष्ट्रपतींना सोपवल्या. आमच्या प्रयत्नांना यश मिळाले आता सरकारला यासंबंधी मोठेपणा मिरवायचा असेल तर त्यांनी मराठी शाळा वाचवाव्यात. त्या अदानींच्या घशात जाऊ देऊ नये.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article