इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास येत आहे:डीआरडीओ अध्यक्ष डॉ. समीर कामत यांचे प्रतिपादन

2 hours ago 1
या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास येत आहे, येथील औद्योगिक ईकोसिस्टिम अतिशय व्हायब्रंट असून, येथील उद्योग संघटना, स्टार्टअप इंक्युबेटर यांचे मोठे योगदान आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीमधून साकारलेल्या प्रकल्पांचा पॅटर्न संपूर्ण देशात राबविला पाहिजे, असे मत देशाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था संरक्षण रिसर्च आणि डेव्हलोपमेंट विभागाचे सचिव आणि डीआरडीओ अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी व्यक्त केले. मॅजिकतर्फे आयोजित छत्रपती शाहू इंजिनियरिंग कॉलेज येथे डिफेंस इनोव्हेशन चॅलेंज फॉर एक्सलंस 2024’ या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत सध्या उत्पादन क्षेत्रात १६% हिस्सा आहे. हा हिस्सा २४-२५% वर नेणे आवश्यक आहे. डीआरडीओ, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांनी एकत्र येऊन आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. संरक्षण क्षेत्रामध्ये २०१४ नंतर काही अमुलाग्र बदल झाले, आपण आत्मनिर्भरतेकडे लक्ष दिले. सुरक्षित देश असेल तर तेथील अर्थव्यवस्था वेगाने वाढेल. भारतात संशोधन आणि विकासावर आपल्या एकूण अर्थव्यवस्थेच्या 0.68% इतका खर्च केला जातो आणि आणि हे पण बहुसंख्य सरकारच्या पुढाकारतून आहे, हे प्रमाण 1 टक्क्याच्या वर गेला पाहिजे, यासाठी खाजगी क्षेत्राने देखील पुढे आले पाहिजे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकासावर 5.6% खर्च केले जाते हे प्रमाणही वाढवता येऊ शकते. भारत विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या लँडस्केपवर प्रभाव टाकण्यासाठी धोरणात्मक स्थितीत आहे, त्यामुळे उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. युद्ध करण्याचा विस्तार आता पारंपारिक जमीन, समुद्र आणि हवा पासून आता सायबर, अंतराळ तसेच माहिती समाविष्ट करणार्‍या नेटवर्किंग मध्ये झाला आहे. तंत्राद्यानात झालेले हे बदल आत्मसात करून नाविन्यपूर्ण उदयोन्मुख तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. 2047 पर्यंत भारत डिफेंस निर्यातीत जगात एक नंबरवर राहील आत्मनिर्भर भारत संकलपणेला चालना देतांना संरक्षण क्षेत्रात देखील भारतीय बनवतीचे उत्पादन होत आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश आयतीवर अवलंबून असणारे हे क्षेत्र यावर्षी 90% निर्माण होणारे उत्पादन भारतीय आहे, आणि केवळ 10% बाहेरील देशातून आयात होत असल्याचे त्यांनी संगितले. यावर्षी भारतातून संरक्षण क्षेत्रातिल निर्यात 20000 कोटी रुपये होती, जी 2037 पर्यन्त 1 लाख कोटी पर्यन्त जाईल. 2047 पर्यन्त भारत संरक्षण क्षेत्रात जगातील सर्वाधिक निर्यात करणारा देश म्हणून नावारूपास येईल, असे त्यांनी संगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article