खानापूर तालुक्यातील जांबोटीजवळ कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झाला.Pudhari Photo
Published on
:
17 Oct 2024, 3:51 pm
Updated on
:
17 Oct 2024, 3:51 pm
खानापूर : कंटेनरची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील जांबोटीजवळील आमटे गावाजवळ घडली. निखिल बाबागौडा पाटील (वय१९ रा.मांजरी ता.चिक्कोडी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर निखिल रमेश बेलागौडा (रा.मुदलगी) गंभीर जखमी झाला आहे. दोघेही बेळगाव येथील जीआयटी महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले.
गुरुवारी (दि.17) वाल्मिकी जयंतीनिमित्त महाविद्यालयाला सुट्टी असल्याने हे दोघे विद्यार्थी दुचाकीवरून गोव्याला जात होते. जांबोटीजवळ समोरून येणाऱ्या कंटेनर वाहनाची धडक बसल्याने हा अपघात घडला आहे. खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, पीएसआय गिरीश एम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर झालेल्या अपघाताचा पंचनामा करून अपघाताचा गुन्हा खानापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला. जखमीला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. तर मृतदेह जिल्हा इस्पितळात उत्तर तपासणी साठी धाडण्यात आला आहे.