काँग्रेसची नेहमीच संविधानविरोधी भूमिका : कांबळेPudhari Photo
Published on
:
18 Oct 2024, 2:30 am
Updated on
:
18 Oct 2024, 2:30 am
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान केला आहे. तब्बल 109 वेळा घटना दुरुस्ती करून नेहमीच संविधानविरोधात भूमिका घेतल्याचे मत माजी मंत्री तथा भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी व्यक्त करत काँग्रेसवर टीका केली.
गुरुवारी (दि. 17) कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांची नेहमीच संविधानविरोधी भूमिका राहिली आहे. डॉ. आंबेडकर हे घटना समितीमध्ये येऊ नये, यासाठी काँग्रेसने प्रयत्न केला होता. त्यांच्या विरोधात जवाहरलाल नेहरू यांनी प्रचार केला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाही पायदळी तुडवत आणीबाणी लादली होती, याची आठवणही कांबळे यांनी करून दिली.राहुल गांधी अमेरिकेत गेल्यानंतर सभागृहामध्ये बहुमत मिळाल्यास आरक्षण रद्द करू असे ते म्हणत आहेत, त्यामुळे काँग्रेसची भूमिका ही नेहमीच संविधान विरोधी राहिली आहे.