कोण होणार जम्मू-काश्मीरचा CM; पहिल्यांदाच होणार हिंदू मुख्यमंत्री?

2 hours ago 1

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची संपूर्ण देश वाट पाहत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार असा प्रश्न सगळ्या देशाला पडला आहे. जम्मू-काश्मीरमधील एक्झिट पोल उद्या समोर येतील. पण जम्मू-काश्मीरचे नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या काँग्रेसकडे राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकेल असा चेहरा नाही. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करून अभियंता रशीद बारामुल्लामधून खासदार झाले होते. ते जामिनावर बाहेर आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून ते विजयी झाले होते. जम्मूमध्ये भाजपला किती यश मिळेल याकडे ही सगळ्यांचं लक्ष आहे. काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसोबत इंजिनीअर रशीद यांचा अवामी इत्तेहाद पक्ष आणि सज्जाद लोनची पीपल्स कॉन्फरन्स हेही महत्त्वाचे घटक आहेत.

इंजिनिअर रशीद यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत जमात-ए-इस्लामीसोबत युती करून राज्यातील अनेक जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी अवामी इत्तेहाद पक्षाच्या बॅनरखाली हे उमेदवार उभे केले आहेत. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यापूर्वी पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती या शेवटच्या मुख्यमंत्री होत्या. फारुख अब्दुल्ला तीन वेळा, मुफ्ती मोहम्मद सईद दोनदा आणि ओमर अब्दुल्ला आणि गुलाम नबी आझाद प्रत्येकी एकदा मुख्यमंत्री राहिले आहेत. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर मेहबुबा मुफ्ती या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. जम्मू-काश्मीरमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक 2014 मध्ये झाली होती. अशा स्थितीत निवडणुकीच्या निकालानंतर जम्मू-काश्मीरला १० वर्षांनी मुख्यमंत्री निवडून आलेल्या सरकारचा मुख्यमंत्री मिळणार आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांचा कौल मतदान यंत्रात बंद केला आहे. आता 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 61.38% तर दुसऱ्या टप्प्यात 57.31% मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यातील 40 जागांपैकी 24 जागा जम्मू विभागातील आणि 16 काश्मीर खोऱ्यातील आहेत. याचा अर्थ जम्मू भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. त्यामुळे या वेळी जम्मू-काश्मीरला पहिल्यांदाच हिंदू मुख्यमंत्री मिळू शकतो.

भारतात कोणताही नागरिक मुख्यमंत्री ते पंतप्रधान आणि राज्यपाल ते राष्ट्रपती अशी पदे मिळवू शकतो. अशी आपल्या राज्यघटनेत हमी दिलेली आहे. यामुळेच देशातील अल्पसंख्याकांनी (मुस्लीम) राष्ट्रपतींसारखे सर्वोच्च पद दोनदा मिळवले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अल्पसंख्याक असूनही मुस्लीम मुख्यमंत्री बनले आहेत. महाराष्ट्र, बिहार, बंगाल आदी राज्यांत मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article