ठाकरे आजारी पडताच निवडणुका जाहीर:आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केली शंका, सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा

2 days ago 1
उद्धव ठाकरे आजारी पडल्याचे टायमिंग साधत निवडणुका जाहीर केल्या, असा संशय ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. आचारसंहितेला 45 दिवस न देणे हे एक षडयंत्र आहे का? असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांची नियुक्ती ही घटनाबाह्य असल्याचेही ते म्हणाले. भास्कर जाधव म्हणाले, निवडणुकीआधी उद्धव ठाकरे आजारी पडणे आमच्यासाठी दुखद आहे. उद्धव ठाकरे आजारी पडल्याबरोबर महाराष्ट्रात निवडणुकीची आचारसंहिता लागते हे आश्चर्यकारक आहे. उद्धव ठाकरे आजारावर मात करून मैदानात उतरतील, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. यामागे षडयंत्र नाही ना? - भास्कर जाधव परंतु, ठाकरे आजारी असताना निवडणूक ठरवावी. आचारसंहितेचा 45 दिवसांचा वेळही त्यांना दिला जाऊ नये, यामागे षडयंत्र नाही ना? असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे. यावरुन सत्ताधाऱ्यांची निती आणि नितीमत्त किती भ्रष्ट आहे दिसते, अशी टीका जाधव यांनी केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती घटनाबाह्य राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती ही घटनाबाह्य असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. 7 आमदारांचा शपथविधी करुन घेणे धक्कादायक आहे. आचारसंहिता लागण्याच्या काही तासांपूर्वी कोर्टात निकाल बाकी असताना विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत राज्यपालांनी गॅझेट कधी काढले? असा सवाल करत आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजस आढळून आले होते. त्यानंतर ठाकरेंवर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात भरती असून डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे. उद्धव ठाकरेंची प्रकृती सध्या स्थिर आहे. रुग्णालयातील डॉक्टर त्यांची काळजी घेत आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर आता 12 वर्षांनंतर त्यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे रुग्णलयात दाखल असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आजारी पडल्याचे टायमिंग साधत निवडणुका जाहीर केल्या, असा संशय ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त करत याबाबत शंका उपस्थित केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article