पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बार्टीने पुढाकार घ्यावा:सम्राट अशोक प्रतिष्ठानतर्फे ‘ बार्टी’चे समन्वयक डॉ. बनसोड यांना निवेदन

4 days ago 3
मराठी सहपाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर पाली भाषेच्या विकासासाठी प्रचार प्रसाराची गरज असून यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी ने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सम्राट अशोक प्रतिष्ठानतर्फे बार्टीचे समन्वयक डॉ संतोष बनसोड यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. पाली भाषा ३ हजार वर्षांपासून अस्तित्वात असून प्राचीन भारतात सर्वात मोठ्या भूभागात बोलली जाणारी लोक भाषा होती, असे अशोक प्रतिष्ठानचे म्हणणे आहे. बाराशे वर्षापर्यंत पालीचे अस्तित्व कायम होते. लिपीचा विकास पाली याच लोक भाषेतून झाला. प्राचिन पाली भाषेतूनच भगवान बुद्धांनी धम्माचा प्रचार ,प्रसार केला. उपदेश , तत्त्वज्ञान पाली याच लोक भाषेतून लोकांना सांगितले. भगवान बुद्धांनी सत्य, अहिंसा ,मैत्री , करूणा ,बंधुभाव, यावर आधारित मानवतावादी धम्म विचार सर्वांना समजेल अशा पाली लोक भाषेत सांगितल्याने भगवान बुद्धांच्या धम्माचा भारतभर प्रभाव निर्माण झाला. बुद्ध धम्माची त्रिपिटीके पाली प्राकृत भाषेतूनच विकसित झालेली आहेत. भगवान बुद्धांचा धम्म विश्ववापी होण्यास पालीचे ऐतिहासिक योगदान लाभलेले असून सम्राट अशोकानेही बुद्धांचे विचार ,उपदेश ,शिलालेख स्तंभलेख, दगडावर कोरण्यासाठी पाली प्राकृत भाषेचा वापर केला. पाली भाषेच्या प्रचार प्रसार आवश्यक असून, यासाठी बार्टीने पुढाकार घेतला पाहिजे, त्यासाठी सरकारनेही निधी दिला पाहिजे, अशी मागणी सम्राट अशोक प्रतिष्ठानने निवेदनात केली. निवेदन देताना प्रतिष्ठानचे प्रा. विजय आठवले, प्रा.डॉ.बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, प्रा. शैलेश इंगळे, प्रा.डॉ. संदीप भोवते,अनिल गवई ,विद्याधर मोहोड आदी होते. अभ्यासक्रमात समावेश हवा प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयात पाली भाषेचा अभ्यासक्रमात समावेश असावा, असाही आग्रह सम्राट अशोक प्रतिष्ठानने धरला असून यासाठी बार्टी ने पुढाकार घेतला पाहिजे, असेही प्रतिष्ठानचे पदाधिकारी बार्टीच्या समन्वयकांना निवेदन देताना म्हणाले. पाली भाषेच्या विकासासाठी बार्टीतून पुढाकार घेऊ पाली भाषेचे संवर्धन,विकास, अभिजात दर्जा टिकवण्यासाठी काम करू,असे आश्वासन डॉ बनसोड यांनी दिल्याचे प्रतिष्ठानचे म्हणणे आहे. पाली भाषेच्या संवर्धनासाठी इतिहास संशोधक, अभ्यासक ,बौद्ध अनुयायी , शिक्षण संस्था,भाषा तज्ज्ञ, साहित्यिक अशा सर्वच समाजघटकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article