बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी मोठी कारवाई:आणखी पाच जणांना पोलिसांनी केली अटक, बिश्नोई टोळीसोबत असल्याचा संशय

2 hours ago 1
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिस जोमारे तपास करत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली. सिद्दिकींच्या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या आणखी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल, कर्जत येथून आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच एका आरोपीला डोंबिवली येथून अटक केली आहे. बाबा सिद्दीकींच्या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे पाचही आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या गँगच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिद्दिकींवरील गोरीबारानंतर लगेच दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर जसजसा तपास पुढे गेला तसतसे अनेकांना अटक करण्यात येत आहे. आज पाच जणांना अटक केली आहे. काय म्हणाले झिशान सिद्दिकी? आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. मी सध्या प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नाहीये. आमच्या बैठका सुरु आहेत. मला माझ्या कुटुंबाची देखील सुरक्षा करायची आहे. आपल्याला उत्तरे नक्कीच दिली जातील. मला उत्तर मिळाल्यानंतर मी आपल्याला लगेच उत्तर देईन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलिस आयुक्त सगळे या प्रकरणात काम करत आहेत. आमचा तपास सुरु आहे. आम्हाला नक्कीच न्याय हवा आहे मला माहिती आहे की, न्याय नक्की मिळेल, असे झिशान सिद्दीकी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. दरम्यान, आमदार झिशान सिद्दीकी यांनी शुक्रवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी करत आपल्या वडिलांच्या हत्येशी संबंधित सर्व धागेदोरे तपासण्याची मागणी करण्यात आली. झिशान सिद्दीकी यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली होती भावना उल्लेखनीय बाब म्हणजे झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी सायंकाळी एका ट्विटद्वारेही या प्रकरणाची न्यायाची मागणी केली होती. माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचे प्राण व घरांचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. आज माझे कुटुंब कोलमडून पडले. पण त्यांच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये. तसेच त्यांचे बलिदान व्यर्थही जाऊ नये. मला न्याय हवा असून, माझ्या कुटुंबालाही न्याय हवा आहे, असे ते म्हणाले होते. हेही वाचा.. आता मी जगणार नाही!:छातीत गोळ्या लागल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या तोंडातून निघाले होते शब्द; वाचा त्या दिवशीचा घटनाक्रम मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर एकूण 6 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 3 गोळ्यांनी त्यांचा वेध घेतला. त्यानंतर मला गोळ्या लागल्यात, आता मी वाचणार नाही. माझा मृत्यू होईल, असे ते म्हणाले. निकटवर्तीयांच्या मते, हेच त्यांचे अखेरचे शब्द होते. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article