भाजपच्या 'त्यागा'ला शिंदे गटाचे 'त्यागा'ने उत्तर:आमच्या त्यागामुळेच राज्याचे मुख्यमंत्रीपद अन् महायुतीची सत्ता आली - भरत गोगावले

2 days ago 1
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने त्यांच्यासाठी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली. भाजपने त्याग केल्यामुळेच ते मुख्यमंत्री झाल्याची बाब त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही केलेल्या त्यागामुळेच राज्यात महायुतीचे सरकार आल्याचा दावा करत एकप्रकारे आपणही भाजपसाठी त्याग केल्याचे ठणकावून सांगितले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले जात होते. पण ऐनवेळी भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. अमित शहा यांनी एका बैठकीत शिंदे यांना या घटनाक्रमाची आठवण करून देत त्यांना भाजपसाठी मन मोठे करण्याची विनंती केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शहा एका बैठकीत शिंदेंना उद्देशून म्हणाले की, शिंदेजी, या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री व तहसीलदार अशी काही महत्त्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्वच पदे केवळ व्यवस्था आहेत. कामे पूर्ण होण्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले. तुमच्यासाठी आमच्या माणसांनी त्याग केला. पण आता जागावाटपात तुम्हाला आपल्या मित्रपक्षांना म्हणजे भाजपला झुकते माप द्यावे लागेल. आमच्या त्यागामुळेच सरकार आले अमित शहा यांच्या या विधानानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांची री ओढली. यावरून महायुतीत बेबनाव निर्माण होत असल्याची चर्चा असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा असे काहीही बोलले नसल्याचा दावा केला. पण त्यानंतरही शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी भाजपला आपल्यामुळेच राज्यात महायुतीचे सरकार आल्याची आठवण करून दिली आहे. भरत गोगावले म्हणाले, त्यांनी जसा त्याग केला, तसा आम्ही देखील त्याग केला. किंबहुना आम्ही केलेल्या त्यागामुळेच आम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले. राज्यात महायुतीची सत्ता आली. प्रत्येकाची भूमिका योग्य आहे. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणायची असेल तर सर्वांना मिळून मिसळून काम करावे लागेल. आम्ही बोलणार नाही, पण कुणी बोलले तर सोडणार नाही श्रीवर्धन मतदारसंघातील महायुतीच्या संघर्षावर बोलताना भरत गोगावले म्हणाले की, आम्ही ठरवले आहे की, रायगडच्या सातही जागा महायुतीच्याच आहेत. त्यासाठी आपल्याला आपापले कार्यकर्ते व पदाधिकारी सांभाळावे लागतील. आम्ही लोकसभा निवडणुकीत जसे त्यांना सांभाळले तसे त्यांना यावेळीही सांभाळावे लागेल. काही अडचणी आल्यास आम्ही त्या मिटवू. श्रीवर्धनची जागा आम्ही आदिती तटकरे यांनाच आम्ही देऊ. आम्ही त्यांच्याविरुद्ध अद्यापही काही बोललो नाही. पण त्यांनी काही केले तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. जनता हेच माझे व्हिजन भरत गोगावले पुढे म्हणाले, माझ्या मतदारसंघातील जनता हेच माझे व्हिजन आहे. येथील एकही गाव, एकही वाडी, एकही वस्ती विकासापासून वंचित राहणार नाही. आम्ही लाभाच्या अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवल्या. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा चांगला परिणाम होईल. महाविकास आघाडीने कितीही टीका केली तरी आमचे कार्यकर्ते त्याचा सामना करतील.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article