भाजपला श्रेय घेण्याची सवय:मराठी भाषेबरोबरच राज्याची प्रतिष्ठाही वाढली पाहिजे, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली अपेक्षा

2 hours ago 1
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मोठा सन्मान आहे. बंगाली, मराठी, पाली, प्राकृत आणि आसामी या पाच भाषांना हा सन्मान देण्यात आला आहे. मराठी भाषेला हा सन्मान मिळावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. खासदार राऊत पुढे म्हणाले की, राज्यातील जवळपास सर्वच पक्षांचे नेते, प्रत्येक मुख्यमंत्री आणि प्रत्येक राज्य सरकारने गेल्या 30-35 वर्षांपासून ही मागणी केली आहे. हे घडले असेल तर यात त्या सर्वांचे योगदान आहे, केवळ एका व्यक्तीचे नाही, प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याची भाजपला सवय आहे. भाजपने उद्योग-व्यवसाय या राज्यातून बाहेर जाणे थांबवावे, मराठी भाषेबरोबरच या राज्याची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट करून लिहिले की, एवढ्या जगात माय मानतो मराठी! धन्यवाद आदरणीय मोदीजी! माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. समस्त मराठी भाषकांतर्फे मी आपले मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या समर्थ पाठबळमुळे हे शक्य झाले. अभिजात दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागणी न्याय्य होती हे आता जगाला पटेल. मोदीजी, आपण माय मराठीचे पांग फेडले आहेत! पुन्हा एकवार धन्यवाद! तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करून सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे फडणवीस यांनी आभार देखील मानले आहेत. या व्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोस्ट करून लिहिले की, मराठी ही केवळ समृद्ध साहित्य निर्माण करणारी भाषा नाही तर तिने आपल्याला नेहमीच स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची प्रेरणा दिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्यानिमित्त मराठी भाषिक भगिनी आणि बांधवांचे हार्दिक अभिनंदन. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा... राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती 6 ऑक्टोबरपासून:जिल्हानिहाय मुलाखतीचे नियोजन काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राहुल यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. काँग्रेसकडे 1688 उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यामुळे 8 ऑक्टोबर पर्यंत इच्छुकांच्या जिल्हानिहाय मुलाखती घेण्याचे नियोजन वरिष्ठ नेत्यांनी केले होते. परंतु, राहुल गांधी 4, 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मुलाखती 6 ऑक्टोबर पर्यंत लांबल्या आहेत. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article