मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी करावी:प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाला सल्ला, क्रीमीलेयर जीआरवरही केले भाष्य

2 days ago 2
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. मात्र ही मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाला लेखी निवेदन देखील देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ते आज सकाळी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. त्यामुळे त्यांनी एका टप्प्यात निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय चांगला असून सर्वच राज्यांमध्ये अशाप्रकारचा निर्णय घ्यायला हवा. मात्र निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी लगेच मतमोजणी व्हावी, अशी आमची मागणी आहे. निवडणूक आयोगाने या मागणीवर विचार करावा. यापूर्वी बॅलेट पेपरद्वारे मतदान व्हायचे तेव्हा दुसऱ्याच दिवशी मतमोजणी केली जायची. मला वाटते की, ईव्हीएम हे मशीन आहे त्यामुळे लगेच मतमोजणी करता येते. दुसऱ्या दिवशीा मतमोजणी झाल्यास निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होणार नाहीत. याबाबत निवडणूक आयोगाला आम्ही लेखी पत्र देखील पाठवणार आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. क्रीमीलेयर जीआर केले भाष्य क्रिमीलेयर जीआरवर बोलताना आंबेडकर म्हणाले, सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण आणि क्रिमीलेयर बाबत जो निर्णय घेतला होता, तो काय होता? त्यावर पॉलिसी बनू शकते की, संसद यावर केवळ निर्णय घेऊ शकते. तर यावर फक्त संसदच निर्णय घेईल आणि हा मुद्दा कोर्टात आहे. मात्र त्याआधीच या राज्य सरकारनेच त्याची अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि जीआरही जारी केला, हे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ओबीसी समाज भाजपला मत देणार नाही प्रकाश आंबेडकर आंबेडकर म्हणाले, ओबीसी समाज भाजपला मतदान करेल, असे मला वाटत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावेळीही आमच्या पक्षाने भूमिका जाहीर केली होती. आम्ही ओबीसींच्या समर्थनासाठी पुढे आलो होतो आणि आरक्षण बचावासाठी उभे राहिले होतो. त्यामुळे भाजपने कितीही प्रयत्न केला तरी ओबीसी समाज त्यांना मतदान करणार नाही, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. हेही वाचा... निवडणूक जाहीर होताच महायुती मैदानात:मुख्यमंत्री शिंदे राहुल गांधी, उद्धव ठाकरेंवर बरसले; फडणवीस- अजित पवारांचींही टोलेबाजी अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महायुतीकडून प्रकाशित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीने एकत्रित पत्रकार परिषद घेत आपले रिपोर्ट कार्ड सादर केले. हे दोन पानांचे रिपोर्ट कार्ड असून या माध्यमातून केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा सादर करत असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article