मला तुझ्या भावापासून सुंदर मुलगा हवाय… दिरासोबत पळाली; नवऱ्याने जे केलं त्याने…

2 hours ago 1

प्रेमात लोक वेडे होतात असं ऐकलं होतं. पण ठार वेडे होतात हे फार कमी वेळा पाहायला मिळालं आहे. मध्यप्रदेशातील छतरपूर येथील एक महिला दिराच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळून गेली. त्यामुळे नवरा अस्वस्थ झाला. कारणही तसंच होतं. पत्नीला सुंदर आणि गोरा मुलगा हवा होता. मला तुझ्या भावापासून सुंदर मुलगा हवाय, असं तिने नवऱ्याला सांगितलं आणि दिराला घेऊन घरातून पलायन केलं. त्यानंतर नवऱ्याने थेट पोलिसात जाऊन तक्रार केली. बायको पळून गेली याचं नवऱ्याला दु:ख नाहीये. तर बायको विष घेऊन आत्महत्या करण्याची धमकी देत आहे, याची भीती असल्याने त्याने पोलिसात तक्रार केली आहे. बायको आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आम्हाला तिच्यापासून वाचवा, असा टाहोच त्यांनी पोलिसांकडे फोडला आहे.

लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर ही महिला पळून गेली आहे. तिला गेल्या दहा वर्षापासून मुल होत नव्हतं. त्यामुळे तिने दिरासोबत पळून जाण्याचा निर्णय गेतला. मला सुंदर मुलगा हवा होता. माझा नवरा सुंदर नाहीये. माझा दीर नवऱ्यापेक्षा अधिकच सुंदर आहे. त्यामुळे दिरापासून मुल व्हावं असं मला वाटत होतं. त्यामुळे दिराकडे आकर्षित झाले. आमचे संबंधही झाले आहेत, असं या महिलेने म्हटलं आहे. हा प्रकार करण्यापासून नवऱ्याने रोखल्यानेच आपण पळून गेल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. या घटनेनंतर आता संपूर्ण कुटुंबच एसपी ऑफिसात न्यायाची मागणी करत आहे.

जीव देण्याची धमकी

छतरपूर येथील सीताराम कॉलोनीत राजेंद्र कुशवाहा राहतो. त्याने आता पोलिसात धाव घेऊन आपली कैफियत मांडली आहे. दहा वर्षापूर्वी त्याचं लग्न मीना कुशवाहाशी झालं. मीना त्याच्या लहान भावासोबत पळून गेली आहे. तसेच मेसेज करून नवऱ्याला धमकावत आहेत. त्यामुळेच राजेंद्र पोलीस ठाण्यात आलाय. बायकोने एक तर माझ्या भावाला फसवून पलायन केलं आहे. वरून आम्हाला धमकावतही आहे. त्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. तिने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्याला आम्ही जबाबदार राहू, असं तिचं म्हणणं आहे. तिला जिकडे जायचं तिकडं जावं. ज्याच्यासोबत राहायचं त्याच्यासोबत राहावं. मला त्याचं काही घेणंदेणं नाही. फक्त तिने आम्हाला त्रास देऊ नये. आमची झाली तेवढी बदनामी पुरे झाली, असं राजेंद्र म्हणाला.

जादूटोणाही केला

मी नेहमी त्रस्त असायचो. त्यामुळे घरात सर्व काही व्यवस्थित चालावं म्हणून मी जादूटोणाही केला. तंत्र, मंत्र देवता वगैरे केलं. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. एका बाबाकडे गेलो तर तो म्हणाला तुम्ही सर्वजण अपवित्र झाला आहात. दोघांनीही गंगेत जाऊन अंघोळ करावी, तुम्हाला मुलगा होईल. तो सुंदर असेल. सर्व काही ठिक होईल. माझ्या बायकोला मी ही गोष्ट सांगितली. गंगेत स्नान करायला जाऊ म्हणून सांगितलं. पण बायकोने ऐकलं नाही. मुल नकोय आणि गंगेत स्नानही करायचं नाही, असं ती म्हणाल्याचा दावा राजेंद्रने केलाय.

चौकशी सुरू आहे

मला तुझ्यापासून मुक्तता हवी आहे. मला माझ्या प्रेमाकडून म्हणजे दिराकडून मूल हवं आहे. त्याच्यावर मी प्रेम करतेय. मला त्याच्यापासूनच मुल हवं आहे. तो दिसायला सुंदर आहे. मला त्याच्याकडूनच सुंदर मूल हवं आहे, असं मीनाने राजेंद्रला सांगितलं होतं. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस इन्स्पेक्टर विक्रम सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजेंद्रने मीना हरवल्याची तक्रार दिली आहे. आम्ही या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी सुरू केली आहे, असं विक्रम सिंह म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article