महाबोधी महाविहार बौध्दांच्या स्वाधीन करा:धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात बोलताना आकाश लामा यांचे आवाहन

5 days ago 2
बुद्धगयेतील महाबोधी महाविहार बौध्दांच्या स्वाधीन करावे, या मागणीसाठी अठराव्या शतकापासूनचा लढा सुरू आहे. मात्र, कोणत्याही सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आता देशातील सर्व संघटनांनी एकाच मंचावर येवून लढा उभारावा, असे आवाहन ऑल इंडिया फोरमचे राष्ट्रीय महासचिव तथा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी येथे आयोजित ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई होते. मंचावर स्मारक समितीचे डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, आर. एन. सुटे, अमेरीकेतील प्रा. केवीन ब्राउन, जापानच्या अराई अजुकोसायजी, अ‍ॅड. शैलेश नारनवरे, भंते धम्मसारथी, भंते संघरत्न मानके, भंते ज्ञानज्योती, भंते माहानागा, भंते प्रज्ञाबोधी, भंते भीमाबोधी उपस्थित होते. यावेळी तामिळनाडू बुध्दिस्ट संघाचे जे. गौतमा साना यांनी लिहलेल्या दोन पुस्तकाचे प्रकाशन ससाई यांच्या झाले. दोन हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने ८४ हजार बुध्द विहार बांधले. त्यापैकी महाबोधी महाविहार हे एक आहे. याठिकाणी जगभरातील अनुयानी येतात. परंतु विहाराचे संचालन बौध्दांच्या हाती नाही. विहारात एक समिती आहे. ही समिती बीटी अ‍ॅक्ट नुसार चालते. या समितीत ९ सदस्य आहे. त्यापैकी केवळ चार आणि पाच इतर धर्माचे प्रतिनिधी आहेत. संपूर्ण देश संविधानावर चालतो. मात्र, महाबोधी महाविहाराचे संचालन बौध्दगया टेम्पल अ‍ॅक्ट १९४९ नुसार सुरू आहे. हा कायदा निरस्त करून विहाराचे संचालन बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे, असे आवाहन करून हा लढा उभारण्यासाठी २१ ऑक्टोबरला देशभरातील विविध संघटनांची बैठक बोलाविली आहे. सर्वांनी एकाच मंचावर येवून महाविहार मुक्ती आंदोलनासाठी लढा द्यावा, असेही लामा म्हणाले. संचालन आणि आभार अशोक जांभूळकर यांनी केले. अराई अजुकोसायजी यांनी स्वागत गीत सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. अखेरच्या श्वासापर्यंत महाविहार मुक्तीसाठी प्रयत्नशील अखेरच्या श्वासापर्यंत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी प्रयत्नशील राहिल, अशी ग्वाही स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागाजुर्न सुरेई ससाई यांनी दिली. १९९२ ते २०१६ पर्यंत म्हणजे तब्बल २३ वर्षांपर्यंत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी विविध टप्प्यात आंदोलन केले. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि आयोगांना निवेदन देवून त्यांचे लक्ष वेधले. मात्र, सरकारकडून दखल घेण्यात आली नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article