महायुतीचे 'रिपोर्ट' नव्हे तर 'डिपोर्ट' कार्ड:15 लाख देणार होते, 1500 दिले; 1080 एकर जमीन अदानीला दिल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप

2 days ago 2
महायुती सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले रिपोर्ट कार्ड पाहता त्यांच्या रिपोर्टकडचे नाव महाराष्ट्र आता डिपोर्ट कार्ड करणार असल्याचा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. कारण अनेक गोष्टी त्यांनी महाराष्ट्रातून डिपोर्ट केल्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या रिपोर्ट कार्ड वर हल्ला चढवला. महायुतीची पत्रकार परिषद होतात आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर हे आरोप केले आहेत. अदानी समूहाच्या फायद्याचे सर्व जीआर प्रकाशित होत नाही, तोपर्यंत आचारसंहिता लागू होत नाही, असे मी आधी देखील सांगितले होते. आचारसंहिता लागण्याआधीच मुंबई आणि राज्यातील मोठे भूखंड अदानी समूहाला देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मधील मंत्रिमंडळाच्या बैठका पाहिल्या तर त्यांच्या प्रत्येक बैठकीत जनतेला काहीतरी देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र या सर्व बैठकांमध्ये अदानी समूहासाठी काही निर्णय घेण्यात आले होते, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. मुंबईतील टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तो अत्यंत कमी टोल असल्यामुळे लोकांना काहीतरी आपल्या हातात मिळत असल्याचे वाटते. मात्र यासोबतच अनेक भयानक गोष्टी महायुती सरकारने केल्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मतदानाच्या दिवशी महाराष्ट्राने या सर्वांवर विचार करणे आवश्यक असल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे. धारावी पुनर्विकास योजनेबद्दल आमचे सर्व मित्र पक्ष सतत आरोप करत आहोत. त्यासाठी अनेक मोर्चे, सभा, चौक सभा, बैठका आम्ही घेतल्या आहेत. मीडियाच्या माध्यमातून देखील या योजनेबद्दलच्या अनेक भयानक गोष्टी समोर येत आहेत. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत पन्नास रुपयांची सूट सर्वसामान्य जनतेला दिली जाते तर 50 कोटी रुपयांचा फायदा अदानी समूहाला दिला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. अदानी समूहाला सरकारने दिलेली जमीन जमीन अदानी यांच्या समूहाला दिला असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या सर्वांचा हिशोब केला तर 1080 एकर भूखंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अदानी यांच्या घशात टाकला असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशात मात्र पन्नास रुपये, शंभर रुपये टाकले जात आहेत. तर दुसरीकडे आदानींना हजारो हेक्टर जमीन मोफत दिली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईकरांना विकत घेता येत नाही, त्यामुळे जोर जबरदस्ती करून, दादागिरी करून अदानी समूहाला भूखंड दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तर अरबी समुद्राचं नाव देखील अदानी समूह करून टाकतील असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. टोल माफीच्या निर्णयावर टीका राज्य सरकारच्या वतीने टोल माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावरचा निर्णय का घेण्यात आला? असा प्रति प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षात होते त्यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य पहा आणि आता दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्यांनी केलेले वक्तव्य पहा. यावरूनच किती पात्री नाटक तयार होऊ शकते, त्याचा अंदाज पत्रकारांनी लावावा, असे आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या टोल माफीच्या निर्णयावर देखील टीका केली. भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य नागरिकांना 15 लाख रुपये देणार होते. मात्र आता ते पंधराशे रुपये देत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा... निवडणूक जाहीर होताच महायुती मैदानात:मुख्यमंत्री शिंदे राहुल गांधी, उद्धव ठाकरेंवर बरसले; फडणवीस- अजित पवारांचींही टोलेबाजी अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महायुतीकडून प्रकाशित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीने एकत्रित पत्रकार परिषद घेत आपले रिपोर्ट कार्ड सादर केले. हे दोन पानांचे रिपोर्ट कार्ड असून या माध्यमातून केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा सादर करत असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले. पूर्ण बातमी वाचा....

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article