महायुतीला तिहेरी आकडा गाठता येणार नाही:महाविकास आघाडी 183 हून अधिक जागा जिंकणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

2 hours ago 1
आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला तिहेरी आकडाही गाठता येणार नाही. याऊलट महाविकास आघाडीला 183 हून अधिक जागा मिळतील, असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आमचा आत्मविश्वास दुणावल्याचेही ते यावेळी म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार समीकरण वाळवेकर यांनी सोमवारी निगरी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त दावा केला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. याचा अर्थ आम्ही तब्बल 65 टक्के जागा जिंकल्या. या गोष्टीचा विचार केला, तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला 183 जागा मिळतील. याऊलट सत्ताधारी महायुतीला तिहेरी आकडाही गाठता येणार नाही अशी स्थिती आहे. महाराष्ट्राचे सामाजिक आरोग्य बिघडले पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण चिंताजनक झाल्याचाही दावा केला. ते म्हणाले, राज्यात बारा बलुतेदार समजा, मराठा समाज, दलित समाज आदी सर्वचजण खेळीमेळीच्या वातावरणात राहत होते. त्यांच्यात केव्हाच तेढ निर्माण झाले नाही. पण आता काही राजकीय पक्ष त्यांच्यात तेढ निर्माण करत आहेत. यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक आरोग्य बिघडले आहे. दलित समाजातील बौद्ध व दलित तसेच हिंदू व दलित अशी विभागणी करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घडवण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात सध्या एकही मोठा उद्योग येत नाही राज्यात माझ्या नेतृत्वात सरकार असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले. पण फडणवीस सरकारला ते टिकवता आले नाही. सध्या राज्यात बेरोजगारीचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. लोकांच्या हाताला काम नाही. मागच्या 10 वर्षांत एकही मोठा उद्योग किंवा कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आली नाही. जे उद्योग येत होते, ते गुजरातला पळवण्यात आले. राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नाही अशी परिस्थिती जाणिवपूर्वक निर्माण करण्यात आली. यामुळे तरुणांवर बेरोजगारी कोसळली. या बेरोजगारीमुळेच राज्यात आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले. हे ही वाचा... राहुल गांधींनी कोल्हापुरात कशी बनवली हरभऱ्याची भाजी?: पाहा VIDEO; शाहू पाटोळेंशी चर्चा; म्हणाले - दलित काय खातात हे कुणालाच माहिती नाही कोल्हापूर/नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी कोल्हापूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर येऊन गेले. या दौऱ्यात त्यांनी सनदे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला. राहुल यांनी या घटनाक्रमाचा एक व्हिडिओ सोमवारी ट्विट केला. या व्हिडिओत ते दलित सामाजिक कार्यकर्ते शाहू पाटोळे यांच्याशी संवाद साधत दलितांच्या खाणपाणाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी दलित काय खातात हे कुणालाच माहिती नाही, असे प्रांजळ मत व्यक्त केले. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article