महाराष्ट्रात ज्यांना बुजर्ग म्हणावे, तेच....:राज ठाकरेंचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, 'महाराष्ट्राची सर्कस झाली, कोणी विदूषक चाळे करते तर मंत्रालयात उड्या मारते'

2 hours ago 1
महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदूषक चाळे करत आहेत तर कोणी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारते. खरेतर महाराष्ट्रातील असे अनेक राजकारणी आहेत त्यांना जाळी नसलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजे, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात ज्यांना बुजर्ग म्हणावे, तेच तसे वागत असल्याचे, राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी शरद पवार यांना देखील टोला लगावला आहे. महाराष्ट्रात सध्या जे अधपतन सुरू आहे, त्याला वृत्त वाहिन्या जबादार आहेत. राजकीय लोक जे बेताल वक्तव्य करतात, ते वृत्तवाहिन्या जसेच्या तसे प्रसारित करून इतरांना तसे बोलण्यास भाग पडतात. जेव्हा वाहिन्या हे दाखविणे बंद करतील, तेव्हा सगळे सुधारतील, त्यामुळे त्यांनी ते दाखविणे बंद करावे, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना केले आहे. राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते. त्याला कोणाचेही बंधन रोहिलेले नाही. त्यामुळे अशा गोष्ट होत असतात. त्यांना अधिकार वाणीने शिकवावे, सांगावे असे आवाहन देखील त्यांनी साहित्यिकांना केले. त्यामुळेच साहित्यिकांनी सर्वांचे कान टोचले पाहिजे, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे. आम्ही बोललो तर ट्रोल होतो, असा विचार करू नका. साहित्यिकांनी राजकारणांना दिशा देण्याचे काम करावे, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मी जे काही बोललो असेल ते सगळे सोशल मीडियावर दिसते. मात्र, मी ते वाचत बसत नाही. त्या भानगडीत मी पडत नाही. माझं बोलून झाले ना, मग विषय संपला, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा... हर्षवर्धन पाटलांचा पवार गटात प्रवेश आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया:नवीन काय सांगताय? ही तर जुनी न्यूज; एका वाक्यातच संपवला विषय भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या या प्रवेशाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिली आहे. या संदर्भातला प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर तुम्ही नवीन काय सांगताय? ही तर जुनी न्यूज आहे. ती आजची न्युज थोडीच आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. पूर्ण बातमी वाचा... लोकसभेच्या काळात काँग्रेसच्या काही नेत्यांची रात्री गडकरींसोबत चर्चा:काँग्रेस नेते विकास ठाकरे यांच्या आरोपामुळे खळबळ लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करत होते. असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केला आहे. नितीन गडकरी यांच्या फोन कॉल मुळे काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी घरी शांत बसून राहिले, असा आरोपही त्यांनी केला. काही नेते हे दिवसा काँग्रेसचा प्रचार करायचे आणि रात्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधत होते, असा दावाही त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यामुळे आता राजकीय चर्चा रंगली आहे. पूर्ण बातमी वाचा... मुख्यमंत्री 40% तर चिरंजीव 20%:संजय राऊत यांचा शिंदेंवर पलटवार; हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश मविआसाठी शुभशकुन असल्याचा दावा लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या योजनेचा चौथा हप्ता देखील मिळणार नसल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सध्या सरकारचे ओव्हर ड्राफवर पैसे देणे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारी कर्मचारी आणि पोलिसांचे पगार द्यायलाही सरकारकडे पैसे नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता कर्जावर राज्य सरकार चालू असल्याचे राऊत यांनी म्हणाले आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article