तामिळनाडू येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडूच्या त्रिची विमानतळाहून यूएई देशातील शारजाह शहरात जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाण केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे हे विमान त्रिची विमानतळाजवळच हवेतच फिरत आहे.
तामिळनाडू येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडूच्या त्रिची विमानतळाहून यूएई देशातील शारजाह शहरात जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाण केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे हे विमान त्रिची विमानतळाजवळच हवेतच फिरत आहे. या विमानात हायड्रोलिक फेल झालं आहे. त्यामुळे विमानाचे चाकं आतमध्ये जाण्यास अडचणी येत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी विमानातील इंधन कमी केलं जात आहे. त्यासाठी विमानाला हवेतच फिरवलं जात आहे. विमानातील झालेल्या बिघाडाच्या पार्श्वभूमीवर त्रिची विमानतळावर प्रशासन सज्ज झालं आहे. त्रिची विमानतळावर जवळपास 20 पेक्षा जास्त रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. या विमानात 141 प्रवासी असल्याची माहिती आहे.