राहुल गांधी कोल्हापुरात टेम्पो चालकाच्या घरी:अजित संधे यांच्या घरी घेतला घरगुती जेवणाचा आनंद, कुटुंबाशी आपुलकीने साधला संवाद

1 hour ago 1
काँग्रेस नेते राहुल गांधी आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यावर पोहोचताच त्यांनी कोणत्याही हॉटेलवर न जाता शहरालगतच्या उचगावातील एका टेम्पो चालकाच्या घरी भेट दिली. तिथे त्यांच्यासोबत घरगुती जेवणाचा आस्वाद घेऊन ते पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले. त्यांच्या या अचानक दौऱ्यामुळे या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. राहुल गांधी यांच्या हस्ते आज कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. ते शनिवारी सकाळी कोल्हापूर विमानतळावर पोहोचले. त्यानंतर ते एका हॉटेलवर व त्यानंतर थेट कार्यक्रमस्थळी जाणे अपेक्षित होते. पण राहुल यांनी त्याला फाटा देत विमानतळावरून थेट कोल्हापूरच्या उचगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील अजित तुकाराम संधे यांच्या घरी पोहोचले. अजित संधे हे एक टेम्पो चालक आहेत. साधारण काँग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. राहुल गांधी जवळपास अर्धा तास त्यांच्या घरी थांबले. तिथे त्यांनी संधे कुटुंबीयांसोबत सकाळचा नाश्ता घेतला. यावेळी त्यांनी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. राहुल यांच्या या भेटीची काही वेळातच पंचक्रोशीत चर्चा रंगली. त्यानंतर तिथे मोठी गर्दी जमा झाली. त्यानंतर काही वेळाने राहुल संधे कुटुंबीयांचा निरोप घेऊन आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमस्थळी निघून गेले. राहुल गांधींनी जपली कुटुंबाची परंपरा दुसरीकडे, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी राहुल गांधी यांच्या या दौऱ्यावर भाष्य केले. ते म्हणाले, गांधी कुटुंबाचा डीएनएच मुळात गोरगरिब कुटुंबासोबत राहणे, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणे व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा आहे. राहुल गांधी आपल्या कुटुंबाची हीच परंपरा जोपासत आहेत. कोल्हापूर शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातील लोकांशी संवाद साधत त्यांचे जीवनमान समजून घेण्यासाठी ते येथे आले होते. ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हेच केले होते. त्यानंतर राजीव गांधी यांनीही हेच केले. ते थेट गोरगरिबांच्या घरी जायचे. सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन, त्यांचे दिनक्रम समजून घ्यायचे. आज राहुल गांधी यांनीही तेच केले. ते एका गरीब व्यक्तीच्या घरी गेले. तिथे त्यांच्यासोबत जेवले. हाच त्यांचा स्वभाव आहे. यातूनच ते गोरगरीब व सर्वसामान्य व्यक्तींचे मन जिंकण्याचे काम कर आहेत, असे विश्वजित कदम म्हणाले. 2 दिवसांचा दौरा ऐनवेळी 1 दिवसाचा उल्लेखनीय बाब म्हणजे राहुल गांधी शुक्रवारीच कोल्हापूरच्या 2 दिवसीय दौऱ्यावर पोहोचणार होते. पण विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. त्यानंतर आज सकाळी ते कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांचा हा दौरा महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article