शंभरावर गावांना पाणीपुरवठा करणारे नळगंगा धरण भरले:71.86 दलघमी जलसाठा झाला उपलब्ध, रब्बी सिंचनाची सोय

4 days ago 3
जिल्हयातील सर्वात जुने व मोठया जलाशयापैकी असलेले मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण पुर्णत: भरले आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे तब्बल दोन वर्षानंतर या धरणाने ७१.८६ दलघमी पूर्ण जल संचय पातळी गाठली आहे. ६६ फुटांपर्यंत या धरणाची पातळी आहे. या धरणामुळे आता या भागातील रब्बी हंगामातील पिकांना सिंचनाचा फायदा होणार आहे. पाटाचे पाणी दिल्या जात असल्याने हजारो हेक्टर शेती सुजलाम, सुफलाम होईल फक्त अवकाळी पाऊस व्हायला नको आहे. या धरणाचा मृत जलसाठा हा २.५४ दलघमी आहे. या धरणावरून मोताळा तालुक्यासह नांदुरा आणी मलकापूर तालुक्यातील जवळपास शंभरावर गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १० ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण भरल्यानंतर गुरुवारी आणी शुक्रवारी या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आणी धरणात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरा धरणाचे पूर्ण अकरा दरवाजे काही इंचापर्यंत उघडण्यात आले होते. हे धरण मातीचे असुन उजवा कालव्याची लांबी ३० किलोमीटर असल्याने त्याचा फायदा या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article