शेतकरी, शेतमजुरांसह महाविकास आघाडीचा मोर्चा:धडकला धामणगाव तहसील कार्यालयावर

2 hours ago 1
प्रतिनिधी | धामणगाव रेल्वे शेतकरी, शेतमजूर, अंगणवाडी सेविका, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या हिताच्या गोष्टी करत शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात भाकपचे जिल्हा सहसचिव सुनील घटाळे उपस्थित होते. या वर्षीची ई-पीक पाहणीची अट रद्द करावी, सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजारांची तत्काळ मदत द्यावी, पावसाअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करून हेक्टरी १० हजारांची तत्काळ मदत द्यावी, हवामान बदलामुळे झालेल्या संत्र्याच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून हेक्टरी १० हजार रुपये मदत द्यावी, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत हेक्टरी २५ हजार रुपये देण्यात यावे, यासह घरकुल, अंगणवाडी सेविका, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला होता. तालुका काँग्रेस कमिटीचे पंकज वानखडे, प्रदीप मुंधडा, जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, चंदू डहाणे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article