हरियाणात जे घडलं, तेच महाराष्ट्रात करणार- अजित पवार:म्हणाले- राज्यातही दलितांना सोबत घेणार, संविधान बदलण्याचा नरेटिव्ह आम्ही बदलतोय

2 hours ago 1
हरियाणाच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. तिथे काँग्रेसला फटका देत भाजपने बाजी मारली आहे. हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा विक्रम भाजपने केला आहे. यापूर्वी कोणत्याही पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करता आलेली नाही. तसेच, आता राज्यातील विधानसभा निवडणुकाही जवळ आल्या आहेत. हरियाणाच्या निकालावरून महाराष्ट्रातही भाजप हरियाणाप्रमाणेच सत्ता मिळवण्यात यशस्वी होणार, असा कयास लावला जात आहे. त्याबाबत बोलतांना अजित म्हणाले की, हरियाणात दलित दुरावले होते. त्यामुळे भाजपने त्यांना सोबत घेतलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही आम्ही करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच, काँग्रेसने संविधान बदलण्याचा जो नरेटिव्ह पसरवला आहे. तो नरेटिव्ह आम्ही बदलत आहोत. आम्ही मायनॉरिटीसाठीचे सर्वाधिक निर्णय घेतल्याचेही दादांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. तसेच, अजित पवारांच्या पक्षात आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी पक्षप्रवेश केला आहे. आम्ही अभिनेत्यांपासून सुरुवात केली आमचे 40 ते 42 सिटींग आहे. समोरच्या बाजूला तेवढ्या जागा रिक्त आहे. त्यामुळे त्यांना संधी आहे. आमच्याकडे 12 ते 15 रिक्त आहे. जेव्हा आम्ही बसू तेव्हा आम्हाला कळेल. त्यांनी आयाराम गयारामांबद्दल काय विधान केलं होतं. आता ते काय बोलत आहेत, कुणाला घेत आहेत हे पाहिलं असेल. शेवटी जनता जनार्दन आणि नेतेही महत्त्वाचे असते. आम्ही नेत्यांना घेण्याऐवजी सिने अभिनेत्यांपासून सुरुवात केली आहे. ते पुढे म्हणाले की, आमच्या पक्षात सर्वांनाच त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी मोकळं वातावरणही आहे. पण पक्षाची भूमिका प्रवक्ते जी भूमिका मांडतील त्याला आम्ही सहमत राहणार असल्याचे दादांनी सांगितले. बैठक का सोडली? अजित पवार यांनी दिले स्पष्टीकरण या संदर्भात अजित पवार यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. मी दहा मिनिटात बैठक सोडली ही संपूर्ण खोटी माहिती असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माझा नियोजित कार्यक्रम लातूर येथे होता. त्यासाठी मला नांदेड विमानतळ येथे पोहोचायचे होते. कॅबिनेटची बैठक सकाळी 11 वाजता बोलवली होती. मात्र, ही बैठक नियोजित वेळेपेक्षा उशीरा सुरू झाली. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा पूर्ण झाल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगूनच मी नियोजित लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी निघालो असल्याचे, अजित पवार यांनी म्हटले आहे. अजितदादा बोलताना म्हणाले, कधीही 40 हजार कोटी कंत्राटदाराचे देणं राहत नाही. उगाच आकडा घ्यायचा आणि वाजवत राहायचं योग्य नाही. दरवर्षी कामे काढतो. त्याचा पैसा देतो. काम करून घेतलं तर पैसे द्यावेच लागतात. निवडणुका आल्या त्या त्यावेळी विरोधी पक्षाने आरोप केले. सत्ताधाऱ्यांनी कर्ज काढलं असा आरोप केला. तुम्ही राज्यकर्ता असला तरी 3 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नाही. केरळमध्ये असं झालं. ते सुप्रीम कोर्टात गेले. त्यावेळी केंद्राने सर्वांना नियम सारखाच असल्याचं सांगितलं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article