हिंगोलीत भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज:14 ठिकाणी स्थिर पथकांच्या माध्यमातून वाहनांची तपासणी

2 days ago 1
हिंगोली जिल्हयात तीन विधानसभा मतदार संघातील निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून १४ ठिकाणी स्थिर पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात येणाऱ्या तसेच जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बुधवारी ता. १६ पत्रकार परिषदेत दिली आहे. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी रामेश्‍वर रोडगे, अभिमन्यू बोधवड यांची उपस्थिती होती. यावेळी गोयल यांनी सांगितले की, जिल्हयात वसमत विधानसभा मतदार संघात ३२७ मतदान केंद्र असून ३ लाख ११७०५ मतदार आहेत. कळमनुरीमध्ये ३४५ मतदान केंद्र असून ३ लाख २० हजार २८२ मतदार असून हिंगोली ३४३ मतदान केंद्रावर ३ लाख २५०१२ मतदार आहेत. या निवडणुकीत तीनही ठिकाणी किमान ७५ टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असून त्यासाठी प्रत्येक गावांमधून जनजागृती केली जात आहे. या शिवाय ५० टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या ४२ केंद्रामध्ये आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यातील निवडणुकीत गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आवश्‍यक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ४८ पथके कार्यरत राहणार आहेत. यामध्ये १२ भरारी पथके, १४ स्थिर पथके, १० व्हिडीओ सनिरीक्षण पथक, ६ व्हिडीओ छायाचित्रीकरण तपासणी पथक, ३ खर्च नियंत्रण पथक तर ३ सहाय्यक खर्च निरीक्षक पथकाचा समावेश आहे. स्थिर पथकाच्या माध्यमातून जिल्हयात येणाऱ्या व जिल्हयाच्या बाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यात १५३०० मतदार ८५ वर्ष वयापेक्षा अधिक असून ६०५३ मतदार दिव्यांग आहे. या मतदारांसाठी घरून टपाली मतदान करण्याची सोय उपलब्ध केली जाणार असून त्यासाठी मतदारांनी एक अर्ज भरून देणे आवश्‍यक आहे. दरम्यान, आदर्श अचारसंहिता पथकही जिल्हयात कार्यरत असून नागरीकांनाही अचार संहिता भंगाबाबत सी व्हिजील ॲपवर ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. सदर तक्रार केल्यानंतर ९० मिनीटांमध्ये या तक्रारीवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. १८ ते १९ वर्ष वयोगटातील २२९५६ मतदार जिल्हयात १८ ते १९ वर्ष वयोगटातील २२९५६ मतदार असून, २० ते २० वर्ष वयोगटातील २.२० लाख, ३० ते ३९ वयोगटातील २.२५ लाख, ४० ते ४९ वयोगटातील १.८९ लाख, ५० ते ५९ वयोगटातील १.४५ लाख, ६० ते ६९ वयोगटातील ९१ हजार, ७० ते ७९ वयोगटातील ५० हजार, ८० वर्षा पेक्षा जास्त वयोगटातील २८ हजार मतदारांचा समावेश आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article