10 वर्षात उमेदवारीत चूक, विकासाचा बॅकलॉग पूर्ण:माजी आमदार राजन पाटील यांची स्पष्टोक्ती

3 days ago 2
मागील दहा वर्षात चुकीचा उमेदवार दिल्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघात म्हणावा तसा विकास झाला नसल्याची कबुली देत, मागील दहा वर्षांचा विकास कामांचा बॅकलॉग या साडेचार वर्षात आमदार यशवंत माने यांनी भरून काढल्याचे सांगत माजी आमदार राजन पाटील यांनी विरोधकांवर जोरदार शब्दिक हल्ला चढवला. टाकळी सिकंदर(ता.मोहोळ) येथे तिऱ्हे मार्ग कुरूल ते पंढरपूर या मंजूर रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते झाले. सुमारे २७१ कोटी २० लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमा साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन कल्याणराव पाटील होते. राजन पाटील यांनी विकासाच्या मुद्यावर राजकारण करणा-या विरोधकांचा भाषणातून खरपूस समाचार घेतला. यावेळी किसन जाधव, हरिदास बंडगर, राजाभाऊ आढेगावकर, अंगद भुसे, सिद्धू गायकवाड यांच्यासह कुरुल, टाकळी सिकंदर येथील नागरिक उपस्थित होते. शेतक-यांच्या भल्यासाठी अनगर अप्पर तहसील अप्पर तहसील कार्यालय हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी स्थापन केले. विरोधकांनी जनतेची दिशाभूल केली. अनगरचाच फक्त विकास करायचा असता तर हा तिऱ्हे रोड सिमेंट काँक्रीट रस्ता अनगरला नेला नसता का? असा सवाल केला. जिथे ज्या कामाची आवश्यकता तिथे विकासकामे करण्याचे काम आम्ही केले. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडू नका, असे राजन पाटील म्हणाले. यावेळी कल्याणराव पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील १७ गावे यशवंत माने यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article