Arvind Kejriwal Attack connected BJP : लोकसभेतील सत्ता समीकरणानंतर भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतल्याची चर्चा जगजाहीर आहे. लोकसभा रणसंग्रामापूर्वी झारखंडमधील एका सभेत भाजप अध्यक्षांनी तर RSS चे महत्व किती आणि काय हे अधोरेखित केले होते. आता नेमका तोच धागा अरविंद केजरीवाल यांनी पकडला आहे.
अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर थेट निशाणा
लोकसभेतील सत्ता समीकरणे बदलली. 400 पारचा नाराच बुमरँग झाला. भाजपला स्वबळावर सत्तेचे मॅजिक फिगर काही गाठता आली नाही. नितीशबाबू आणि चंद्रबाबू हे दोन सत्तादूत धावून आले. भाजपने आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सूर जुळवले आहेत. पण लोकसभा रणसंग्रामापूर्वी झारखंडमधील एका सभेत भाजप अध्यक्षांनी तर RSS चे महत्व किती आणि काय हे अधोरेखित केले होते. आता नेमका तोच धागा अरविंद केजरीवाल यांनी पकडला आहे. त्यांनी आता असा वर्मी घाव घातला आहे.
हे सुद्धा वाचा