Rajinikanth : का झाला रजनीकांतचा राग अनावर?

2 hours ago 2

Published on

22 Sep 2024, 11:32 am

Updated on

22 Sep 2024, 11:32 am

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत नेहमी शांत स्वभावामुळे ओळखले जातात. त्यांना आतापर्यंत कधीच रामावलेले किवा चिडलेले पाहण्यात नाही. मात्र, आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत थलायवा अतिशय भडकलेले दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये अभिनेता रजनीकांत २० सप्टेंबर रोजी 'बट्टेयन' ऑडियो लाँचच्या अगोदर चेन्नई एअरपोर्टवर पोहोचले. असे म्हटले जाते की, याच ठिकाणी कनगराजच्या 'कुली'चे काही सीन्स शूटिंग करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना माजी अभिनेता आणि डीएमके नेता उदवनिधी स्टॉलन यांच्याबद्दल विचारलं गेलं, तेव्हा रजनीकांत मीडियावर भडकले.

व्हिडीओमध्ये, पापाराझी उदयनिधी स्टॅलिन तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री बनण्याच्या अफवांवर विचारताना दिसत आहेत. त्यावेळी संतप्त झालेल्या रजनीकांत यांनी रागावून उत्तर दिलं आहे, 'मला राजकीय प्रश्न विचारू नका. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे.' त्यांना विचारण्यात आले की, 'वेट्टय्यान' ऑडिओ लॉन्चसाठी कोण कोण उपस्थित राहणार आहे. त्यावर त्याने उत्तर दिले, 'मला माहीत नाही सर.'

त्यांनी विमानतळावर उपस्थित पत्रकारांना सांगितले की, 'वेट्टय्यान' येत आहे आणि त्यासाठी आपण उत्सुक आहोत." रजनीकांत यांना या चित्रपटातील भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'हे वेगळे असेल.' असे त्यांनी म्हटलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article