हिंगोलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट; फटाके फोडून केला जल्लोष
हिंगोली (Government ITI College) : येथील शासकीय आयटीआय महाविद्यालयास भारतरत्न स्व. नानाजी देशमुख यांचे नाव देण्यात आल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ८ ऑक्टोबर रोजी जाहीर केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवनेरी चौक अकोला बायपास येथे. फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले भारतरत्न स्व. नानाजी देशमुख यांचे नाव हिंगोली येथील (Government ITI College) शासकीय आयटीआय कॉलेजला देण्यात आले आहे.
हिंगोलीकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, सुमित घिके, ऋषीकेश पोले, केशव तनपुरे, गणेश जाधव, संजय देशमुख, शशिकांत देशमुख, विकास जोजार, संजय चव्हाण, अभिषेक वानखेडे, लक्ष्मण थोरात, कान्होजी थोरात, दिलीप माने, सतिश घोरपडे, रामू थोरात, अर्जुन थोरात, राजेश मोकाटे,विशाल जिरवणकर, यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.